शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

बल्लारपूर पेपर मिलने लावली वैदर्भियांना फूटबॉलची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:52 AM

फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी!

ठळक मुद्देआठवणींचा ठेवाअखिल भारतीय सामन्यांची ३० वर्षांची परंपरा खंडित

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी! त्यांच्या या गोडीतूनच पेपरमिल कॉलनीतील फूटबॉल मैदानावर सातत्याने ३० वर्षे अखिल भारतीय स्तरीय फूटबॉल सामने होत राहिलेत. हे सामने बघण्याकरिता केवळ पेपरमिल कॉलनीच नव्हे तर बल्लारपूर परिसरातील बामणी, विसापूर व चंद्रपुरातील फुटबॉलप्रेमी यायचे. पेपर उद्योग सुरू झाल्याच्या काही वर्षांतच पेपर मिलने क्रीडा मैदान तयार करून त्याला ‘फूटबॉल ग्राऊंड’ असे नाव दिले होते. या मैदानावर कबड्डी, हॉकी इत्यादी खेळ खेळले जात. मात्र, व्यवस्थापनाचा भर फूटबॉल खेळाकडे अधिक होता. कर्मचारी व त्यांच्या मुलांची या खेळात रूची वाढावी, चांगले खेळाडू तयार व्हावेत हा व्यवस्थापनाचा हेतू होता. याकरिता खेळाडूंना विविध सोयी पुरविल्या जात असे. यातून पेपर मिलची फूटबॉल टीम तयार झाली. या टिमने अन्य राज्यांत खेळून काही बक्षिसेही पटकाविली होती. या मैदानावर वार्षिक विशाल मेळावा आणि रावणदहन कार्यक्रम व्हायचा. मात्र या मैदानाची फूटबॉल मैदान हीच अखेरपर्यंत राहिली. नंतर व्यवस्थापनाने थापर उद्योग समूहाचे संस्थापक स्व. लाला करमचंद थापर यांच्या स्मृतीत अखिल भारतीयस्तरीय फूटबॉल सामने भरविणे सुरू केले.या सामन्यात पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र, आसाम तसेच अन्य राज्यांतील नामवंत टीम खेळायला येऊ लागल्या. सुमारे १२-१५ दिवस चालत राहणाऱ्या सामन्यातील चमूच्या खेळांची चर्चा व्हायची. अंतिम महत्त्वाचे काही सामने कर्मचाºयांना बघता यावे याकरिता व्यवस्थापन पाळीच्या वेळामध्ये बदल करीत होती. यामुळे हे सामने बघण्याला कर्मचाऱ्यांना संधी मिळून त्यांची सामन्यात रूची वाढायची आणि अंतिम सामना कोण जिंकणार याची त्यांच्यात पैज लागायची. अंतिम दोन तीन सामने बघण्याकरिता फूटबॉल प्रेमींची या मैदानाकडे रिघ लागायची. अशी प्रचंड लोकप्रियता येथे या खेळाला मिळाली होती.फूटबॉल सामने हे एखाद्या मोठ्या पर्वासारखे क्रीडाप्रेमींना वाटायचे. काही वर्षांनी मात्र यात व्यवस्थापनाची रूची कमी होत गेली. उद्योगाच्या विस्ताराची इमारत याच फूटबॉल मैदानावर उभी करण्यात आली. ३० वर्षे सुरू असलेल्या सामन्यांची परंपरा कायमची बंद झाली. सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम ठप्प झाले ते कायमस्वरूपातच! आता केवळ आठवणी स्मरणात राहिल्या आहेत.

कलामंदिराला आली अवकळाबल्लारपूर पेपर मिलने कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता बीपीएम कलामंदिर संस्थेची स्थापना केली. भव्य मंच उभारून ‘कलामंदिर’ असे मोहक नाव त्या परिसराला देण्यात आले होते. कलामंदिराच्या मंचावरुन आठवड्यातून एकदा चित्रपट दाखविला जात होता. या मंचावर हिंदी-मराठी नाट्य तसेच एकांकिका स्पर्धा, कवी संमेलन, आर्केस्ट्रा, रामलिला हे कार्यक्रम व्हायचे. आता ते सारे कार्यक्रम बंद होऊन कलामंदिराला अवकळा आली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा