शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:55 PM

१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमुंबईला जाणे होणार सोपेसेवाग्राम रेल्वे बंद?

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कायमस्वरुपी बंद झाली. त्यामुळे चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईला जाणे कठीण झाले होते. नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी रेटून धरल्यानंतर रेल्वेने आता बल्लारशाह- मुंबई ही ट्रेन थेट चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी पूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस होती. बल्लारशाह-वर्धा पॅसेंजरला मुंबईकडे जाण्यासाठी सहा डब्बे जोडले जात होते. नागपूरहून येणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला वर्धा येथे हे डब्बे जोडून मुंबईला जात होते. मात्र, कोरोनानंतर एक्स्प्रेस बंद झाल्या. यामध्ये मुंबईला जाण्यासाठी हक्काची सेवाग्राम एक्स्प्रेस कायमची बंद झाली. विशेष म्हणजे, रेल्वेने आता लिंक प्रणाली सुरू केल्यामुळे डब्बे जोडणे शक्य नाही.

दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजीमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रनिधींनी रेल्वे विभागाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन रेल्वे सुरू करण्याची मागणी रेटून धरली. त्यातच बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम पूर्णत्वास आल्याने बल्लारशा-मुंबई या ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून बल्लारशाह येथून रात्री ९.३० वाजता दररोज ही ट्रेन मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांसह रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेनची मागणी करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार, बैठका घेऊन मागणी केली. आता या ट्रेनला हिरवी झंडी मिळाली असून, लवकरच ही ट्रेन सुरू होणार आहे.

- श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेballarpur-acबल्लारपूरMumbaiमुंबई