शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 13:24 IST

१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमुंबईला जाणे होणार सोपेसेवाग्राम रेल्वे बंद?

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कायमस्वरुपी बंद झाली. त्यामुळे चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईला जाणे कठीण झाले होते. नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी रेटून धरल्यानंतर रेल्वेने आता बल्लारशाह- मुंबई ही ट्रेन थेट चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी पूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस होती. बल्लारशाह-वर्धा पॅसेंजरला मुंबईकडे जाण्यासाठी सहा डब्बे जोडले जात होते. नागपूरहून येणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला वर्धा येथे हे डब्बे जोडून मुंबईला जात होते. मात्र, कोरोनानंतर एक्स्प्रेस बंद झाल्या. यामध्ये मुंबईला जाण्यासाठी हक्काची सेवाग्राम एक्स्प्रेस कायमची बंद झाली. विशेष म्हणजे, रेल्वेने आता लिंक प्रणाली सुरू केल्यामुळे डब्बे जोडणे शक्य नाही.

दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजीमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रनिधींनी रेल्वे विभागाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन रेल्वे सुरू करण्याची मागणी रेटून धरली. त्यातच बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम पूर्णत्वास आल्याने बल्लारशा-मुंबई या ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून बल्लारशाह येथून रात्री ९.३० वाजता दररोज ही ट्रेन मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांसह रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेनची मागणी करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार, बैठका घेऊन मागणी केली. आता या ट्रेनला हिरवी झंडी मिळाली असून, लवकरच ही ट्रेन सुरू होणार आहे.

- श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेballarpur-acबल्लारपूरMumbaiमुंबई