शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 13:24 IST

१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमुंबईला जाणे होणार सोपेसेवाग्राम रेल्वे बंद?

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कायमस्वरुपी बंद झाली. त्यामुळे चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईला जाणे कठीण झाले होते. नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी रेटून धरल्यानंतर रेल्वेने आता बल्लारशाह- मुंबई ही ट्रेन थेट चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी पूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस होती. बल्लारशाह-वर्धा पॅसेंजरला मुंबईकडे जाण्यासाठी सहा डब्बे जोडले जात होते. नागपूरहून येणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला वर्धा येथे हे डब्बे जोडून मुंबईला जात होते. मात्र, कोरोनानंतर एक्स्प्रेस बंद झाल्या. यामध्ये मुंबईला जाण्यासाठी हक्काची सेवाग्राम एक्स्प्रेस कायमची बंद झाली. विशेष म्हणजे, रेल्वेने आता लिंक प्रणाली सुरू केल्यामुळे डब्बे जोडणे शक्य नाही.

दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजीमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रनिधींनी रेल्वे विभागाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन रेल्वे सुरू करण्याची मागणी रेटून धरली. त्यातच बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम पूर्णत्वास आल्याने बल्लारशा-मुंबई या ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून बल्लारशाह येथून रात्री ९.३० वाजता दररोज ही ट्रेन मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांसह रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेनची मागणी करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार, बैठका घेऊन मागणी केली. आता या ट्रेनला हिरवी झंडी मिळाली असून, लवकरच ही ट्रेन सुरू होणार आहे.

- श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेballarpur-acबल्लारपूरMumbaiमुंबई