शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बाेलेराे आदळली; पती-पत्नीसह चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 18:36 IST

Chandrapur News गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपूर : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर किसाननगरजवळ शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झाला. मृतात पती, गर्भवती पत्नी, मेहुणा तसेच गडचिरोलीतील एकाचा समावेश आहे.

अनुप ताडूरवार (३५), त्याची पत्नी माहेश्वरी ताडूरवार (२५) दोघेही रा. विहीरगाव ता. सावली, माहेश्वरीचा भाऊ मनोज तीर्थगिरवार (२९) रा. ताळगाव जि. गडचिरोली, डीजे व्यावसायिक पंकज बागडे (२६) रा. गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र हरेंद्र मसराम (२३) रा. चिखली ता. सावली हा किरकोळ जखमी झाला आहे.

ताडूरवार कुटुंब, मेहुणा व मित्रासह एमएच-३३/ए-५२५७ क्रमांकाच्या बोलेरोने शुक्रवारी चंद्रपूर येथे खासगी कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री परत गडचिरोलीला येत होते. किसाननगर येथे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या बसला होता. तेथील गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात सीजी-०७/बीएस-७७४७ या क्रमांकाच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यात बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा झाला. तर वाहनातील चारजण जागीच ठार झाले. घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार बोधे, नीलेश, स्वप्निल दुर्योधन, दर्शन लाटकर आदी करीत आहेत.

कुटुंबाचा आधारच हिरावला

एकुलता एक असलेल्या अनुप ताडूरवार यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. आईने मोलमजुरी करून त्याचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थितीतून सावरत अनुपने मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. अनुपची पत्नी माहेश्वरी ही तीन महिन्यांची गर्भवती होती. सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, शुक्रवारी दोघांवरही काळाने झडप घालून हिरावून नेले. अनुपला तीन वर्षीय मुलगा व वृद्ध आई आहे. अपघातात दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने मुलगा व वृद्ध आई पोरके झाले. या घटनेने विहिरगावात शोककळा पसरली आहे. तर गडचिरोली येथील पंकज बागडे हासुद्धा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. अनुप व पंकज दोघेही मित्र डीजे व्यवसायात जम बसवला होता. त्यांच्या निधनाने गडचिरोलीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेवारस जनावरांमुळे घडला अपघात

चंद्रपूर-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर नेहमीच बेवारस जनावरे बसून असतात. याच बेवारस जनावरांमुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. निरपराधांचा जीव गेल्याने प्रशासनाने तत्काळ बेवारस जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात