शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बाेलेराे आदळली; पती-पत्नीसह चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 18:36 IST

Chandrapur News गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपूर : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर किसाननगरजवळ शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झाला. मृतात पती, गर्भवती पत्नी, मेहुणा तसेच गडचिरोलीतील एकाचा समावेश आहे.

अनुप ताडूरवार (३५), त्याची पत्नी माहेश्वरी ताडूरवार (२५) दोघेही रा. विहीरगाव ता. सावली, माहेश्वरीचा भाऊ मनोज तीर्थगिरवार (२९) रा. ताळगाव जि. गडचिरोली, डीजे व्यावसायिक पंकज बागडे (२६) रा. गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र हरेंद्र मसराम (२३) रा. चिखली ता. सावली हा किरकोळ जखमी झाला आहे.

ताडूरवार कुटुंब, मेहुणा व मित्रासह एमएच-३३/ए-५२५७ क्रमांकाच्या बोलेरोने शुक्रवारी चंद्रपूर येथे खासगी कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री परत गडचिरोलीला येत होते. किसाननगर येथे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या बसला होता. तेथील गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात सीजी-०७/बीएस-७७४७ या क्रमांकाच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यात बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा झाला. तर वाहनातील चारजण जागीच ठार झाले. घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार बोधे, नीलेश, स्वप्निल दुर्योधन, दर्शन लाटकर आदी करीत आहेत.

कुटुंबाचा आधारच हिरावला

एकुलता एक असलेल्या अनुप ताडूरवार यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. आईने मोलमजुरी करून त्याचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थितीतून सावरत अनुपने मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. अनुपची पत्नी माहेश्वरी ही तीन महिन्यांची गर्भवती होती. सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, शुक्रवारी दोघांवरही काळाने झडप घालून हिरावून नेले. अनुपला तीन वर्षीय मुलगा व वृद्ध आई आहे. अपघातात दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने मुलगा व वृद्ध आई पोरके झाले. या घटनेने विहिरगावात शोककळा पसरली आहे. तर गडचिरोली येथील पंकज बागडे हासुद्धा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. अनुप व पंकज दोघेही मित्र डीजे व्यवसायात जम बसवला होता. त्यांच्या निधनाने गडचिरोलीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेवारस जनावरांमुळे घडला अपघात

चंद्रपूर-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर नेहमीच बेवारस जनावरे बसून असतात. याच बेवारस जनावरांमुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. निरपराधांचा जीव गेल्याने प्रशासनाने तत्काळ बेवारस जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात