शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

सेवादासनगरवासी बैलबंडीने आणतात तेलंगणातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:44 IST

नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देगावकरी हैराण : पाण्यासाठी रात्रभर जागरण

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत असून शेतकरी दिवसभर मशागतीची कामे सोडून पाण्यासाठीच भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या सेवादासनगरात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई असते. फेब्रुवारी महिन्यापासुनच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतीच्या मशागतीचे कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना बैलबंडीतून पाणी आणणे सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य कमल राठोड या सेवादासनगरातील रहिवाशी आहेत. लगतच्या गावातच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राहतात. पण, तालुक्याचे तर सोडाच पण शेजारच्या गावात जाऊन पाणी टंचाईची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यास वेळ नसल्याची टीका गावकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळेच पाणी टंचाईची समस्या दूर झाली नाही.पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापुरातही हीच स्थिती आहे. शिवाय, परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. महिला हैराण झाल्या आहेत. पं. स. सदस्य अंजना पवार यांनी सेवादासनगरातील जलसंकटाविषयी अधिकाऱ्यांना पत्र दिले. परंतु समस्या जैसे थे असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येत्या सात दिवसांत गावातील पाणी समस्या सोडविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई