शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आझाद बगिचाचा कायापालट

By admin | Updated: February 7, 2017 00:31 IST

शहरातील एकमेव अबुल कलाम आझाद बगिचा कात टाकत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेऊन या बागेचा कायापालक सुरू केला आहे.

चंद्रपूर : शहरातील एकमेव अबुल कलाम आझाद बगिचा कात टाकत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेऊन या बागेचा कायापालक सुरू केला आहे. महिनाभरापासून बगिचाचे नूतनीकरण सुरू आहे. नूतणीकरणाची निविदा प्रक्रिया वादात अडकल्यापासून हा बगिचा मद्यपींचा अड्डा बनला होता. आता येथे लहान मुले, महिला, पुरूष व वृद्ध आदी सर्व वयोगटातील लोकांसाठी सुविधा उभारण्यात येत आहेत.‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून दि. १९ डिसेंबर रोजी ‘आझाद बगिचा बनला मद्यपींचा अड्डा’ या मथळ्याखाली सर्व गैरप्रकार उघडकीस आणले होते. त्यामुळे मनपाचे प्रशासन खडबडून जागे झाले. या स्टिंग आॅपरेशनंतर प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन अबुल कलाम आझाद बगिचाचे नूनतणीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता खेळ, मनोरंग, आरोग्य आदी विविध शिर्षाखाली मनपाचा मिळणाऱ्या निधीचा उपयोग करण्यात येत आहे. मनपाकडे उपलब्ध निधीतून जेवढे काम करणे शक्य आहे, तेवढ्या सुविधा आझाद बगिचामध्ये उभारण्यात येत आहेत.जिल्ह्यात दारूबंदी असताना आझाद बगिचा मद्यापींसाठी रात्रीला दारूचा अड्डा ठरला होता. त्याचे पुरावे, सकाळी ‘मार्निंग वॉक’ करणाऱ्यांना दिसत होते. बगिच्याच्या झुडपांमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास इतस्त: विखुरलेले दिसले होते. सायंकाळनंतर रात्र जसजशी चढत जाते. त्यानुसार शहरातील थंडी वाढत जाते. ही वाढती थंडी पाहून सामान्य नागरिकांची गर्दी कमी होत होती. अशी निर्मनुष्य बाग मद्यपींसाठी पर्वणी ठरत होती. नागरिकांना सायंकाळी व सकाळी फिरण्याकरिता शहराच्या मध्यभागी आझाद बगिचा हक्काचे ठिकाण आहे. तरूण मुले-मुलीदेखील तेथे फिरण्यास येतात. तेथे महिला व पुरूष योग करून आपले आरोग्य निरोगी राखण्याचा प्रयत्न करतात. हा दररोजचा नित्यक्रम आहे. मनपाने बागेची नूतणीकरण सुरू केल्याने आता पुन्हा गर्दी वाढली आहे. आझाद बागेजवळ नाला वाहतो. या नाल्यातील पाण्याचा पुनर्वापर करून झाडांना देण्यात येत आहे. त्यामुळे बागेत हिरवळ फुलली आहे. (प्रतिनिधी)बागेतील ग्रीन जीम नागरिकांसाठी खुलेबागेमध्ये महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जीम साकारण्यात आले आहे. या जीमवर व्यायाम करण्यासाठी सकाळ आणि सायंकाळी मोठी गर्दी होत आहे. ही ग्रीन जीम २६ जानेवारीपासून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. महिला व पुरूषांसाठी वेगवेगळ्या जीम तयार करण्यात आल्या आहेत.वॉकर, लिप्टर आदी लावण्यात आले आहे. नवीन झुले, वाकिंग ट्रॅकची स्वच्छता आदी मनाला आनंद देत आहेत.शहीद स्मारक झाले चकाचकब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक म्हणून आझाद बगिचामध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेले सैनिक आणि चांदा जिल्ह्यातील शहीद बाबुराव पहेलवान बापू राजगोंड यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चबुतरा, कृत्रिम धबधबा आदी याशिवाय महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे. नेतांजीच्या पुतळ्यासमोर पाण्याच्या प्रवाहासाठी असलेल्या हौदाचेही नूतनणीकरण करण्यात आले आहे. तेथे रंगीत वॉकरफाल, फिश तुषारही लावण्यात येणार आहे.सायंकाळी अंधारामुळे होते गैरसोयबागेचे नूतणीकरण शहरात एक पर्यटक स्थान निर्माण करण्यात येत आहे. मात्र, बागेच्या काही भागात विद्युत दिवे नसल्याने सायंकाळी अंधार पडल्यावर नागरिकांची गैरसोय होते. अंधार असलेल्या भागात नागरिक टार्च घेऊन जातात. तेथे टॉर्च लावून व्यायाम करतात. अंधारामुळे साप, विंचू आदी प्राणी-किटकांची भीती आहे. देखण्या कचराकुंड्यांचे आकर्षणया बगिचामध्ये आधी कचरा इतस्त: पडलेला असायचा. आता मात्र, नागरिकांनी बागेत घाण करू नये, यासाठी देखण्या कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी पेंग्विन पक्षाच्या कचराकुंड्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. बागेत येणारे नागरिकही बाहेर कचरा न फेकता त्या कुंडीमध्ये टाकत आहेत. त्यामुळे बागेचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि आकर्षक दिसत आहे. प्रेमी युगुलांची डोकेदुखीमनपाचे आझाद बागेचे नूतणीकरण सुरू केल्यापासून शहरातील नागरिकांची गर्दी वाढली आहे. मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करणारे मोठ्या संख्येने सकाळी व सायंकाळी येत असतात. बागेचे आकर्षण आता पे्रमी गुगुलांनाही वाटू लागले आहे. आधी युवक-युवतींचे जोडपे केवळ सायंकाळी येत होते. परंतु आता सकाळपासूनच हे जोडपे बागेच्या परिसरात घुटमळत असतात. त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांची डोकेदुखी वाढली आहे. दुपारी बाग बंद ठेवण्यात येत असली तरीही प्रेमी युगूल बागेच्या बाहेर परिसरात दुचाकीवर बसलेले असतात. निविदेच्या वादात न अडकता काम सुरूआझाद बगिचा नव्याने निर्माण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी तक्रारी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. त्यानंतर पुन्हा यावर्षी सप्टेंबर महिन्यात मनपा स्थायी समितीने निविदा मंजूर केली. परंतु पुन्हा ही निविदा तक्रारीच्या जाळ्यात अडकली आहे. त्या निविदा प्रकियेचा निधी उपयोगात न आणता मनपाने दुसऱ्या उपलब्ध निधीतून हे नूतणीकरण सुरू केले आहे.