शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांची पिकांसाठी जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अजूनही वनविभागाला यश आले नाही, ही शोकांतिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वत:च्या जिवाची कोणतीही पर्वा न करता वन्यप्राण्यांचा धोका पत्करून शेती जगली पाहिजे, या उद्दात हेतूने शेतकरी रात्री पिकांची राखण करीत रात्रभर शेतात थांबून जागल करीत आहे. वन्यप्राण्यांमुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण होत आहे.निसर्गाची अवकृपा आणि सरकारचा नाकर्तेपणा यामुळे शेतकरी दिवसेंदिवस हतबल होत चालला आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपले आहे. शेती पिकेल तर देश टिकेल हे ब्रीदवाक्य केवळ नावापुरतेच उरले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भाग जंगलांनी व्यापला आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी मोठया प्रमाणात शेतात येतात. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापुर, कढोली, अंतरगाव, गोयेगाव, चूनाळा, पंचाळा, सातरी, चनाखा परिसरात वन्यप्राण्यांनी शेतात मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्ताची जबाबदारी वनविभागाची असताना अजूनही शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली नाही.दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकºयांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अजूनही वनविभागाला यश आले नाही, ही शोकांतिका आहे. वन्यप्राण्यांकडून होणाºया नुकसानीचा आकडा खूप मोठा आहे. परंतु वनविभाग केवळ तोकडी नुकसान भरपाई देऊन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सध्या शेतात कापूस, तूर, ज्वारी, चना पिके डौलाने उभी आहेत. परंतु वन्यप्राणी पिकांची दिवसा डोळ्यादेखत नासधूस करीत आहे. काबाडकष्ट करून जिवापाड जपलेल्या पिकांची एका रात्रीतून वाट लावली जात आहे. हाती येणारे पीक वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. कपाशीला बोंडे लागली असून कापूस निघायला सुरुवात झाली आहे.तूर पीक फुलोºयावर आले आहे. कपाशीवर केला जाणारा खर्च मोठा आहे. पिकांवर केलेला खर्च भरून निघेल की नाही, याची चिंता शेतकºयांना चांगलीच सतावत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाला असताना वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना पीक वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून ‘जागल’ करावी लागत आहे. परंतु अजूनही वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही.कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावावन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जागल करतात. परंतु जंगली प्राणी शेतकºयांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करीत आहे. यावर वनविभागाने कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.वन्यप्राणी भरदिवसा शेतात येऊन पिकांची मोठया प्रमाणात नुकसान करीत आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी मोठया कष्टाने पीक फुलविले आहे. परंतु हाती येणारे पीक वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकºयांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांच्या रक्षणासाठी जागल करावी लागत आहे.-गुलाबराव चौथले, शेतकरी, पंचाळा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती