शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:02 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे.

ठळक मुद्देबहुतांश तलावात ठणठणाट : जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे तलाव, बोड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होत नाही. यावेळीही तसेच झाले. मात्र आता जिल्ह्यातील अनेक तलाव, बोड्यांमध्ये पाणी नसून ते कोरडे पडले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे असे मिळून एकूण ९७ तलाव आहेत. या तलावांमध्ये सरासरी २६.६३ टक्केच पाणी आहे, हे विशेष.चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले तलाव हे एखाद्या मैदानासारखे झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाईमुळे शेतकरी आपले जनावरे मोकळ्या जागेत सोडतात. परंतु या जनावरांना आता तलावात पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांना घरीच पाणी पाजावे लागत आहे. यंदा आधीच तलावांमध्ये पाणी नव्हते. त्यात शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला व आता पाण्याविना तलाव कोरडे पडले आहे. शासनाने लाखो रूपये खर्च करून तलाव व बोडी तयार केल्या. परंतु पाणीच नसल्याने त्याचा ऐन उन्हाळ्यातच उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.अशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. प्रशासनाने ही बाब लक्षात घेउन एक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.नळ योजनांचाही बट्ट्याबोळशासनाने विविध गावांमध्ये नळयोजना सुरू केली. परंतु अनेक गावात नळ योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. काही नळ योजना तांत्रिक अडचणीमुळे तर काही ग्रामपंचायतेच्या उदासीन धोरणामुळे बंद आहे. अनेक गावात नळयोजनेंतर्गत बांधलेल्या टाक्या या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहे. नळ योजने अंतर्गत नाला, नदीच्या माध्यमातून गावागावात पाणी पोहचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले व लाखो रूपयांचा निधी प्रत्येक गावात खर्च केला. परंतु शासनाचा उद्देशच असफल झाल्याचे दिसते. जिथे नळ योजना बंद आहे, त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.शेततळे व विहिरी कोरड्याग्रामीण भागात शासनाने लागेल त्याला विहीर व शेततळे दिले. मात्र पाऊस कमी पडल्याने शेततळे कोरडे असून विहिरीची पातळी ही दिवसागणिक खालावत आहे. पूर्वी विहिरी कमी होत्या, तसेच विंधन विहिरी नव्हत्या. परंतु सद्यस्थितीत अनेक शेतात व गावात विंधन विहिरीची निर्मिती झाली व पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. काही भागात तर २०० ते ३०० फुट विंधन विहीर खोदली तरी पाणी लागत नाही. अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहे. पुढे सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई