शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:02 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे.

ठळक मुद्देबहुतांश तलावात ठणठणाट : जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे तलाव, बोड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होत नाही. यावेळीही तसेच झाले. मात्र आता जिल्ह्यातील अनेक तलाव, बोड्यांमध्ये पाणी नसून ते कोरडे पडले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे असे मिळून एकूण ९७ तलाव आहेत. या तलावांमध्ये सरासरी २६.६३ टक्केच पाणी आहे, हे विशेष.चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले तलाव हे एखाद्या मैदानासारखे झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाईमुळे शेतकरी आपले जनावरे मोकळ्या जागेत सोडतात. परंतु या जनावरांना आता तलावात पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांना घरीच पाणी पाजावे लागत आहे. यंदा आधीच तलावांमध्ये पाणी नव्हते. त्यात शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला व आता पाण्याविना तलाव कोरडे पडले आहे. शासनाने लाखो रूपये खर्च करून तलाव व बोडी तयार केल्या. परंतु पाणीच नसल्याने त्याचा ऐन उन्हाळ्यातच उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.अशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. प्रशासनाने ही बाब लक्षात घेउन एक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.नळ योजनांचाही बट्ट्याबोळशासनाने विविध गावांमध्ये नळयोजना सुरू केली. परंतु अनेक गावात नळ योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. काही नळ योजना तांत्रिक अडचणीमुळे तर काही ग्रामपंचायतेच्या उदासीन धोरणामुळे बंद आहे. अनेक गावात नळयोजनेंतर्गत बांधलेल्या टाक्या या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहे. नळ योजने अंतर्गत नाला, नदीच्या माध्यमातून गावागावात पाणी पोहचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले व लाखो रूपयांचा निधी प्रत्येक गावात खर्च केला. परंतु शासनाचा उद्देशच असफल झाल्याचे दिसते. जिथे नळ योजना बंद आहे, त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.शेततळे व विहिरी कोरड्याग्रामीण भागात शासनाने लागेल त्याला विहीर व शेततळे दिले. मात्र पाऊस कमी पडल्याने शेततळे कोरडे असून विहिरीची पातळी ही दिवसागणिक खालावत आहे. पूर्वी विहिरी कमी होत्या, तसेच विंधन विहिरी नव्हत्या. परंतु सद्यस्थितीत अनेक शेतात व गावात विंधन विहिरीची निर्मिती झाली व पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. काही भागात तर २०० ते ३०० फुट विंधन विहीर खोदली तरी पाणी लागत नाही. अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहे. पुढे सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई