शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:02 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे.

ठळक मुद्देबहुतांश तलावात ठणठणाट : जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे तलाव, बोड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होत नाही. यावेळीही तसेच झाले. मात्र आता जिल्ह्यातील अनेक तलाव, बोड्यांमध्ये पाणी नसून ते कोरडे पडले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे असे मिळून एकूण ९७ तलाव आहेत. या तलावांमध्ये सरासरी २६.६३ टक्केच पाणी आहे, हे विशेष.चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले तलाव हे एखाद्या मैदानासारखे झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाईमुळे शेतकरी आपले जनावरे मोकळ्या जागेत सोडतात. परंतु या जनावरांना आता तलावात पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांना घरीच पाणी पाजावे लागत आहे. यंदा आधीच तलावांमध्ये पाणी नव्हते. त्यात शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला व आता पाण्याविना तलाव कोरडे पडले आहे. शासनाने लाखो रूपये खर्च करून तलाव व बोडी तयार केल्या. परंतु पाणीच नसल्याने त्याचा ऐन उन्हाळ्यातच उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.अशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. प्रशासनाने ही बाब लक्षात घेउन एक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.नळ योजनांचाही बट्ट्याबोळशासनाने विविध गावांमध्ये नळयोजना सुरू केली. परंतु अनेक गावात नळ योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. काही नळ योजना तांत्रिक अडचणीमुळे तर काही ग्रामपंचायतेच्या उदासीन धोरणामुळे बंद आहे. अनेक गावात नळयोजनेंतर्गत बांधलेल्या टाक्या या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहे. नळ योजने अंतर्गत नाला, नदीच्या माध्यमातून गावागावात पाणी पोहचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले व लाखो रूपयांचा निधी प्रत्येक गावात खर्च केला. परंतु शासनाचा उद्देशच असफल झाल्याचे दिसते. जिथे नळ योजना बंद आहे, त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.शेततळे व विहिरी कोरड्याग्रामीण भागात शासनाने लागेल त्याला विहीर व शेततळे दिले. मात्र पाऊस कमी पडल्याने शेततळे कोरडे असून विहिरीची पातळी ही दिवसागणिक खालावत आहे. पूर्वी विहिरी कमी होत्या, तसेच विंधन विहिरी नव्हत्या. परंतु सद्यस्थितीत अनेक शेतात व गावात विंधन विहिरीची निर्मिती झाली व पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. काही भागात तर २०० ते ३०० फुट विंधन विहीर खोदली तरी पाणी लागत नाही. अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहे. पुढे सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई