शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमुरातील किल्ला मैदान ठरले ऑगस्ट क्रांतीचे केंद्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:32 IST

‘करा व मरा’चा नारा पोहोचला होता चिमुरात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून दिला संदेश

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीडशे वर्षाची इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ हा नारा दिला. या नाऱ्याने संपूर्ण देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पसरला. हाच नारा चिमुरातील किल्ला मैदानात पोहोचला आणि क्रांतिकारक पेटून उठले. या क्रांतीचे गवालिया टँक व चिमुरातील किल्ला मैदान हे क्रांतीचे शक्तीस्थळ ठरले होते. 

अभ्यासक्रमात व्हावा समावेश

विदर्भातील चिमूर (चंद्रपूर), आष्टी (वर्धा), यावली (अमरावती), बेनोडा येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्यांची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही. इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून १९४२मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.

१३ ऑगस्टला निघाली होती प्रभातफेरी

मुंबईत ८ ऑगस्टला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना केली. ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. करेंगे या मरेंगे हा महात्मा गांधीजींचा आदेशरूपी संदेश चिमुरात ९ ऑगस्टला पोहोचला. १० ऑगस्टला वर्धा येथे अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. यात इंग्रजांनी जंगलू हमाल या स्वातंत्र्यवीराला ठार केले. ही घटना चिमूर येथील उद्धवराव कोरेकार यांनी प्रत्यक्ष पाहिली. 

१२ ऑगस्टला कोरेकार चिमूर येथे येताच त्यांनी गणपत सावरकर यांच्या घरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली. १३ ऑगस्टला मोठी प्रभातफेरी काढण्याचे ठरले. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून चिमूर येथे घडलेल्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांतून क्रांतीची बीजे पेरण्यात आली आणि किल्ला मैदानातून १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमुरात रणसंग्राम पेटला होता. या लढ्याच्या आठवणी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ताज्या होतात.

टॅग्स :historyइतिहासchimur-acचिमूरchandrapur-acचंद्रपूर