शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमुरातील किल्ला मैदान ठरले ऑगस्ट क्रांतीचे केंद्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:32 IST

‘करा व मरा’चा नारा पोहोचला होता चिमुरात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून दिला संदेश

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीडशे वर्षाची इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ हा नारा दिला. या नाऱ्याने संपूर्ण देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पसरला. हाच नारा चिमुरातील किल्ला मैदानात पोहोचला आणि क्रांतिकारक पेटून उठले. या क्रांतीचे गवालिया टँक व चिमुरातील किल्ला मैदान हे क्रांतीचे शक्तीस्थळ ठरले होते. 

अभ्यासक्रमात व्हावा समावेश

विदर्भातील चिमूर (चंद्रपूर), आष्टी (वर्धा), यावली (अमरावती), बेनोडा येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्यांची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही. इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून १९४२मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.

१३ ऑगस्टला निघाली होती प्रभातफेरी

मुंबईत ८ ऑगस्टला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना केली. ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. करेंगे या मरेंगे हा महात्मा गांधीजींचा आदेशरूपी संदेश चिमुरात ९ ऑगस्टला पोहोचला. १० ऑगस्टला वर्धा येथे अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. यात इंग्रजांनी जंगलू हमाल या स्वातंत्र्यवीराला ठार केले. ही घटना चिमूर येथील उद्धवराव कोरेकार यांनी प्रत्यक्ष पाहिली. 

१२ ऑगस्टला कोरेकार चिमूर येथे येताच त्यांनी गणपत सावरकर यांच्या घरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली. १३ ऑगस्टला मोठी प्रभातफेरी काढण्याचे ठरले. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून चिमूर येथे घडलेल्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांतून क्रांतीची बीजे पेरण्यात आली आणि किल्ला मैदानातून १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमुरात रणसंग्राम पेटला होता. या लढ्याच्या आठवणी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ताज्या होतात.

टॅग्स :historyइतिहासchimur-acचिमूरchandrapur-acचंद्रपूर