शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

शासन परिपत्रकांमुळे शिक्षकांत गोंधळाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

कोरोनामुळे यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शाळांना सुट्या जाहीर झाल्या. त्यानंतर परीक्षा न होताच विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा लागले. हे सर्व झाले असताना आता शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध परिपत्रक काढले जात आहे. १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून ९ ते १० व्या वर्गांची, १ ऑगस्टपासून ६ ते ८, १ सप्टेंबरपासून ३ ते पाचव्या वर्गाची शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने पत्रक काढले आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांचा ताण वाढला : शिक्षकांना उपस्थित राहण्याची वेळ अनिश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता आहे. असे असतानाही शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या पत्रकामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरु असताना शिक्षकांनी शाळेत कोणत्या वेळी उपस्थित राहायचे, यावर शिक्षण विभागाने पत्र काढले नसल्याने या गोंधळात आणखीच भर पडली आहे.कोरोनामुळे यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शाळांना सुट्या जाहीर झाल्या. त्यानंतर परीक्षा न होताच विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा लागले. हे सर्व झाले असताना आता शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध परिपत्रक काढले जात आहे. १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून ९ ते १० व्या वर्गांची, १ ऑगस्टपासून ६ ते ८, १ सप्टेंबरपासून ३ ते पाचव्या वर्गाची शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने पत्रक काढले आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीला विशेषाधिकारही देण्यात आले. यानुसार शाळा व्यवस्थापन समिती ठरविणार त्यानुसार शाळा सुरु करण्यासंदर्भात या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार काही शाळा व्यवस्थापन समितीने गावात कोरोनाचा प्रादूर्भाव नाही, अशा गावांत शाळा सुरु करण्यासंदर्भात ठराव घेतला. यासंदर्भात समितीने ठरविल्यानुसार त्या-त्या वर्गांची तारीखही निश्चित केली. यानंतर २७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून १५ जूनच्या शासननिर्णयानुसार शाळा सुरु करण्याबाबत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ज्या शाळा निर्णयाचे पालन करणार नाही, तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भात तक्रार आल्यास मुख्याध्यापक, शाळाव्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. आम्हच्या गावात कोरोनाचे रुग्ण नाही. त्यातच शासनाच्या अर्टी, शर्तीचे पालन करून शाळा सुरु करण्यासाठी काय हरकत आहे, असा प्रश्न शाळा सुरु करण्यासंदर्भात ठराव घेतलेल्या समिती उपस्थित करीत आहेत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाचे तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्नही या समितीतील सदस्य उपस्थित करीत आहेत.सध्या शेती हंगामाचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतात जातात. तर त्यांचे पाल्य दिवसभर गावात इकडे-तिकडे फिरत असतात. अशावेळी काही अनुचित घटनाही घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना घरी न ठेवता शाळेत पाठवून दिवसभरासाठी सुरुक्षित ठेवू इच्छीतो. त्यामुळे शासनाने गावातील शाळा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केल्यास शेतकरी, शेतमजूर पालकांची समस्या सुटू शकते. हाही विचार काही शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण शाळा लवकर सुरु कराव्या, अशी मागणीही केली जात आहे.वर्क फ्रॉम होमचीही सुविधाशिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकामध्ये महिला शिक्षकांना शाळेत येण्यासंदर्भात मुभा देण्यात आली आहे. त्यातच ज्या शिक्षकांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांनाही वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. तर ज्या शिक्षकांना मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार असे आजार आहे. त्यांनाही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकारातीलच ज्या शाळांत शिक्षक आहे. त्या शाळांचे काय, तसेच ज्या शाळांत केवळ शिक्षिका आहे त्या शाळा सुरू कशा राहतील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.वेळेचे काय, शिक्षकांचा प्रश्नशिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात शासनाने पत्र काढले आहे. यामध्ये काही नियमही आहे. मात्र विद्यार्थ्यांविना शाळा सुरु असताना शिक्षकांनी नेमके कितीवेळ शाळेत उपस्थित राहायचे, यासंदर्भात उल्लेख नसल्यामुळे काही शिक्षक केवळ स्वाक्षरी करून मोकळे होत आहे तर काही प्रामाणिक शिक्षक सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेत हजर राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे.ग्रामीण पालकांची चिंता वाढलीलॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणावरही भर दिला जात आहे. यामध्ये शहरी विद्यार्थी काही प्रमाणात सहभाग घेत अभ्यास करणे सुरु केले आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड फोन नाही, काहींकडे आहे तिथे नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे आम्हच्या पाल्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद