शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

Ativrushti Nuksan Bharpai : चंद्रपुरातील १३ हजार ७४२ शेतकऱ्यांना दिलासा ! तीन महिन्यांनंतर मिळणार अवकाळीचे ७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 20:18 IST

तीन महिन्यांनंतर मंजुरी : ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने जिल्ह्यातील ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील पीक उद्ध्वस्त झाले होते. शासनाने तीन महिन्यांनंतर मंगळवारी (दि. १२) ७ कोटी ३३ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली. भरपाईचा लाभ १३ हजार ७४२ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ८ हजार २१ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला. चंद्रपूर जिल्हा हा उष्ण तापमानासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र २०२५ च्या जून, जुलै व ऑगस्ट कालावधीतच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जुलै महिन्यातही तीच परिस्थिती कायम होती. ऑगस्ट महिन्यातही याची तीव्रता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात करतो. मात्र, याच महिन्यात अतिवृष्टीने तडाखा दिला. याचा सर्वाधिक फटका वरोरा, भद्रावती, राजुरा, जिवती कोरपना, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्याला बसला. यातील बरेच शेतकरी धान, सोयाबीन व कपाशीची शेती करतात. शासनाने भरपाई दिल्यास हंगामासाठी उपयोगी होईल, याकडे डोळे लावून बसले होते.

उसणवारी करून हंगाम पूर्ण

विलंब झाल्याने काहींनी पीक कर्ज तर अनेकांनी उसणवारी करून हंगाम पूर्ण केला होता. जिल्हा प्रशासनाने २८ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य शासनाने भरपाईचा प्रस्ताव पाठविल्यानंतर अखेर जिल्ह्यासाठी ७ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

नुकसान भरपाई वितरणास विलंब नको

शासनाकडून भरपाई मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात वितरणास बराच विलंब होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जमा केलेले पैसे हंगामात खर्च झाले. आता हाती पीक किती येईल, याची काहीही खात्री नाही. त्यामुळे मंजूर भरपाई तातडीने वितरण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संकटांची मालिका सुरूच

ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात शेतकऱ्यांना तीन पुरांचा सामना करावा लागला. यातही पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे अंतिम सर्वेक्षण अद्याप झाले नाही. पिकांना पुराचा तडाखा बसल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. संकटांच्या मालिकेने शेतकरी हतबल झाल्याचे जिल्ह्यातील स्थिती आहे. 

"मंजूर निधी आर्थिक वर्षे २०२५-२६ मधीलच आहे. त्यामुळे पूर्व नियोजित उपलब्ध निधीतून तत्काळ वितरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या."- संपत सूर्यवंशी, सहसचिव, महसूल व वन विभाग

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीfloodपूरmonsoonमोसमी पाऊस