शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींच्या ‘त्या’ आठवणींचा कार्यकर्त्यांना गहिवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:21 IST

जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देचंद्रपुरातील स्मृती : तीनही दौऱ्यात कार्यकर्त्यांच्याच घरी केले भोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्ते तणावात असतानातच अटलजी म्हणाले, ‘आपने लक्ष्य पूरा नही किया, ये बढी बात नही. लेकीन पूरा जोरसे ताकत लगाया ये बहुत बडी बात है.’ १९८२ ला चंद्रपुरात घडलेली ही घटना. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना गहिवरले.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे चंद्रपूर शहरात तीनदा येऊन गेलेत. राजकारणाच्या पलिकडे विविध विषयांचा व्यासंग जोपासणारे अटलजींनी चंद्रपुरातील तिनही दौºयात नागरिकांची मने जिंकली. १९७८ ला राजे विश्वेश्वराव आत्राम यांच्या प्रचारासाठी आले होते. १९८२ ला अ‍ॅड. दादा देशकर यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढली होती. या प्रचारसभेत अटलजींनी अत्यंत तन्मयतेने देशातील ज्वलंत समस्यांची मांडणी केली होती. ही आठवण रमेश बागला यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितली.पक्षनिधीसाठी ११ लाख गोळा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. परंतु ही रक्कम जमली नाही. ‘अटलजी काय म्हणतील’ ही भिती मनात ठेवूनच आम्ही एक लाखाचा निधी त्यांच्याकडे सुपूर्त केला. हा अल्प निधी असल्याचे लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. कार्यकर्त्यांची पाठराखण केली. हा प्रसंग विसरु शकत नाही, असेही बागला यांनी सांगितले.‘चंद्रपूर आने की, जरूरत नही थी’१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. देशभरात प्रचारसभा गाजवत असताना चंद्रपुरातही आले होते. ही सभा चांदा क्लब ग्राऊंडवर झाली. सभेनंतर विश्रामगृहात अटलजींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘यहा सुधीर जैसा स्ट्राँग कॅन्टेड खडा है मुझै आने की, जरुरी नही थी’ अशी टिप्पणी त्यांनी केली होती, अशी आठवणही रमेश बागला यांनी सांगितली.देशातील असंख्य कार्यकर्त्यांचे पितृछत्र हरपले - सुधीर मुनगंटीवार१९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवार होतो. अटलजींनी त्यावेळी आपल्या भाषणात म्हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. माझ्या समाजिक आणि राजकीय प्रवासात त्यांचे हे कौतुकोद्गार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले, अशी शोकसंवेदना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींच्या जाण्याने एका ध्यासपर्वाची अखेर झाली आहे, तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात, समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला, पण तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.चंद्रपूरच्या समस्या जाणल्या१९७८, १९८२ व १९८९ या तिनही दौऱ्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्रपुरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे जेवण केले. बडेजाव न करता भाजपचे तत्कालीन युवा कार्यकर्ते रमेश मांडलिक, सुरेश चिमूरकर व घागगुंडे कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. खाली चटईवर बसून जेवण करताना अटलजींनी कुटुंबीयांसह चर्चा केली. जिल्ह्याच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार