शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा दिलासा: तालुक्यात बंधारे बांधण्याला प्राधान्य

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिंचनाच्या अपुऱ्यां सोयीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जावू नये, यासाठी तालुक्यातील मारोडा येथील आर्च व चिरोली येथील पायलट बंधारा नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या आर्च व पायलट बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचनात वाढ झाली आहे.तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील मारोडा येथील आर्च बंधारा केवळ आठ लाख रूपयांत पूर्ण करण्यात येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले आणि सहायक अभियंता रूपेश बोदले यांना यश आले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठाही मोठया प्रमाणावर आहे, पाणीसाठयात वाढ होण्याच्या दृष्टीने आर्च बंधारे नागपूर आणि अमरावती विभागात मोठया प्रमाणावर बांधण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर येथे पार पडलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंता बैठकीत दिले.तालुक्यातील आर्च बंधाऱ्यासोबतच जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील पायलट बंधाराही नागरिकांचे आकर्षण बनले आहे. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १८३.३१ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सदर बंधाऱ्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे.तालुक्यातील चिरोलीजवळील अंधारी नदीवर सुमारे ९० मीटर लांबीचा पूल २०१५-१६ या वित्तीय वर्षात बांधण्यात आले होते. सदर पूलाच्या बाजुला बांधलेल्या बंधाऱ्याला २.८३ मीटर लांब व ३.५० मीटर उंचीचे २३ दरवाजे लावण्यात आले आहे. या ठिकाणी ३.९३ लक्ष घनमीटर पाणी साठा राहू शकतो. केवळ सहा महिन्यात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमीपर्यंत पाण्याचा साठा आहे.सदर बंधाऱ्याला वेगवेगळया राज्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी भेट देत आहेत. येत्या काही महिन्यात तालुक्यातील चिचाळा, बोरचांदली, नलेश्वर चिमढा येथील बंधाऱ्यांचे काम पुर्णत्वाा जाण्याची शक्यता आहे.मुनगंटीवारांकडून अधिकाऱ्यांची स्तुतीसिंचनाची समस्या कायस्वरूपी दुर व्हावी, यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले, सहा. अभियंता रूपेश बोदले यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील मारोडा येथील १५ मीटर लांबीच्या आर्च बंधाऱ्याला माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची स्तुती केली. तालुक्यात यासारखे बंधारे मोठया प्रमाणावर बांधून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी