शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

अर्ज २२ हजार; मंजुरीसाठी प्रस्तावित केवळ ४०७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:58 PM

केंद्र शासनाने गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकूल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात ही योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : माहिती अधिकारातील धक्कादायक वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकूल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात ही योजना राबविली जात आहे. यासाठी चंद्रपूर शहरातील तब्बल २२ हजार ५४ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. मात्र यापैकी केवळ ४०७ लाभार्थ्याचे अर्ज राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारातून समोर आली आहे. या प्रकारामुळे अर्ज सादर करणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांना घरकूल योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना सुरू करून त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना विविध जाहिरातींच्या माध्यमातून आकर्षित करीत आहे. मात्र योजनांच्या लाभासाठी किचकट अटी लावण्यात आल्याने लाभार्थीही त्रस्त आहेत. मात्र गरिब लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी आटापीटा करून सर्व कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज सादर करीत आहेत.मात्र त्यानंतरही लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार अनेकदा बघायला मिळाला आहे. असाच प्रकार आता चंद्रपूर महानगर पालिकेत समोर आला आहे.चंद्रपुरातील गोपाल अमृतकर यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत १४ एप्रिल २०१४ ला मनपाला अर्ज करून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत किती लाभार्थ्यांनी पालिका क्षेत्रातून अर्ज सादर केले, किती लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले, मंजूर लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामाला सुरूवात झाली, याबाबत माहिती मागितली.या अर्जानुसार चंद्रपूर महानगर पालिकेचे जन माहिती अधिकारी तथा शहर अभियंता बांधकाम विभाग यांनी माहिती दिली असून २२ हजार ५४ लाभार्थ्यांपैकी केवळ ४०७ लाभार्थ्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे नमूद केले आहे.तसेच अद्यापही कोणत्याही लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याने कोणत्याही बांधकामाला सुरूवात झालेली नाही, असे म्हटले आहे. यावरून पालिकेचा भोंगळ कारभार उजेडात आल्याने लाभार्थ्यांत रोष पसरला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्यासाठी मानसिक त्रास सहन केला. मात्र त्यानंतरी केवळ ४०७ लाभार्थ्यांचे अर्ज प्रस्तावित करण्यात आल्याने याचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ठ आहे. लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या का, होत्या तर त्या त्रुटींची पुर्तता का करून घेतली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तर शासनाकडूनही प्रस्तावित अर्जांना मान्यता देण्यासाठी विलंब होत असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून आहे.मनपाच्या तिजोरीत २२ लाखांचा महसूलजाहीरातबाजीतून लाभार्थ्यांना प्रलोभन देण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसाठी १०० रुपये अर्ज विकत घेऊन शेकडो लाभार्थ्यांनी महानगर पालिकेत रांगा लावून अर्ज सादर केले. हक्काचे घर मिळेल अशी लाभार्थ्यांना आशा होती. त्यामुळे अर्ज सादर करणाºया २२ हजार ५४ लाभार्थ्यांकडून १०० अर्जाप्रमाणे २२ लाख ५ हजार ४०० रूपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. मात्र केवळ ४०७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करून पालिकेने लाभार्थ्यांची थट्टाच केली आहे, अशी प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत.एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाहीचंद्रपूर मनपा क्षेत्रातून २२ हजार ५४ लाभार्थ्यांपैकी ४६० अर्ज मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एकाही प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. कित्येकांना आपले प्रस्ताव मंजूर की नामंजूर झाले, हे सुद्धा माहिती नाही. घर मिळणार या आशेने लाभार्थी चकरा मारत आहेत. अशी स्थिती सर्वत्र असल्याचे समजते.आवास योजना केवळ लॉलीपॉपगरीब जनतेला फसविणाºया भाजपा नेत्यानी असुरी आनंद व्यक्त करीत महानगर पालिकेवर झेंडा फडकविला. काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजनांचे नावे बदलून निव्वळ योजनांचा गवगवा मोदी सरकार करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे केवळ लॉलीपॉप होते, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.