शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नागभीडबाबत शासनाची परस्परविरोधी भूमिका

By admin | Updated: June 28, 2015 01:40 IST

नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या परस्परविरोधी कार्यक्रमांमुळे येथील नागरिक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत.नागभीडसह परिसरातील सहा सात गावे मिळून नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भातील अधिसूचना नगरविकास मंत्रालयाने १५ जून रोजी प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार १४ जुलै ही शेवटची आक्षेपाची तारीख आहे. असे असे असले तरी राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात नागभीडसह नागभीड नगरपरिषदेत समावेश होऊ घातलेल्या अन्य ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. यामुळेच लोकांचा संभ्रम आणखीच वाढला आहे.नगरविकास मंत्रालयाने नगरपरिषदेची अधिसूचना प्रसिद्ध केली असली तरी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार येथील तहसील प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे. नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ४ आॅगस्ट रोजी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रियेला लवकरच आरंभ होणार आहे. प्रस्तावित नागभीड परिषदेला काही गावांनी विरोध दर्शविला असल्याने नगरपरिषदेची स्थापना काही अंशी वांद्यात आली असली तरी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाला नगरपंचायतीचा दर्जा मिळणारच आहे.नागभीड नगर परिषद जरी झाली नाही तरी नगरपंचायत होणार हे निश्चीत आहे. आणि म्हणूनच ज्या संभावित नगरपंंचायती किंवा नगरपरिषदा आहेत, त्यांना या निवडणूक कार्यक्रमातून वगळण्याची गरज आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणारे लोक निवडणुकीसाठी नामांकन भरतील. प्रचार करतील यात लोकांचा पैसा निश्चितच खर्च होणार आहे. एवढेच नाही तर शासकीय पातळीवर प्रशासनही कामाला लागेल. यात ई.व्ही.एम. मशीन जुळवाजुळव, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण त्यांचे मानधन व इतर बाबींवर लाखो रुपयांचा खर्च होणार, हे अटळ असून या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची घोषणा होणार. यामुळे लोकांच्या आणि प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार, हे निश्चित आहे. अगदी चार महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुकास्थळी असेच झाले. राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार या तालुक्यास्थळांचा नगरपंचायतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच निवडणूक आयोगाने तेथील ग्रामपंचाययतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सर्व प्रक्रिया पार पाडली आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी नगरपंचायतीची अधिसूचना जारी करुन ग्रामपंंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.गडचिरोलीत जे झाले ते नागभीडबाबत होऊ नये. लोकांच्या आणि प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरु नये. लोकांच्या आणि शासनाच्या पैशाचा चुराडा होऊ नये. यासाठी नागभीड आणि नागभीड नगर परिषदेत समाविष्ट संभावित गावांची ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया तुर्त स्थगित ठेवावी, अशी मागणी आहे. ही शासकीय प्रक्रिया आहे. ती थांबू शकत नाही. नगरपरिषदेची ही प्रक्रिया सुरू आहे. १५ जुलैला आक्षेपाची मुदत संपत आहे. ग्रामपंंचायत निवडणुकीच्या अगोदर जे काही करता येईल. ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.- कीर्तीकुमार भांगडिया,आमदार चिमूर.नेतेही संभ्रमातग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला की गावात राजकीय मंडळीत उत्साह संचारतो. गल्लीबोळात मोर्चेबांधणी सुरू होते. मात्र यावेळी नगरपालिकेची चर्चा असल्याने राजकीय नेतेमंडळीही संभ्रमात आहेत.