शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करा

By admin | Updated: October 4, 2015 01:48 IST

निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो.

शिवाजीराव मोघे : पाणी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसादकान्हाळगाव (कोरपना) : निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो. शेतीला पाणी ही आवश्यक गरज आहे. त्यामुळे सिंचनाचाही मोठा अनुशेष या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होऊ शकतो. यासाठी या प्रकल्पाच्या कामाला गती येऊन हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावा, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. ते कोरपना येथे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व पाणी परिषदेमध्ये बोलत होते.याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया, तेलंगणाचे माजी जलसंपदा मंत्री रामचंद्र रेड्डी, गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, आर्णीचे नगराध्यक्ष आरिफ बेग, छाया मडावी, आदिलाबादचे नगराध्यक्ष दिगंबर पाटील, नरसिंहराव, त्र्यंबक पाटील, बाळासाहेब मोघे, गजानन गावंडे, प्रकल्प संयोजक अ‍ॅड.विजय घुले, डॉ.विजय देवतळे, अशोक नागापूरे, विजय पाटील, घनश्याम मुलचंदानी, अनकेश्वर मेश्राम, सुधा सिडाम, डॉ.अशोक राजूरकर आदी उपस्थित होते. मोघे पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी १९७० पासून दोन्ही राज्यातील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. हा प्रकल्प १९८५ मध्ये पूर्णत्वास येणे अपेक्षित असताना आजतागयत तो रेंगाळलेलाच आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पाचाही खर्च वाढत चालला आहे. मात्र प्रकल्पाला चालना येऊ शकली नाही. यासाठी राजकीय अनास्था तेवढीच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास न आल्यास वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून १९७५ च्या पाणी करारान्वये ८८ टक्के पाणी महाराष्ट्राला तर १२ टक्के पाणी या प्रकल्पामुळे तेलंगणाला उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पामुळे नांदेड, आदिलाबाद, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख १७१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रकल्प संयोजक अ‍ॅड. विजय घुते, माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. परिषदेचे संचालन रमजान अली यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदरू जुमनाके, साईनाथ बुच्चे, अविनाश जाधव, घनश्याम नांदेकर, महेंद्र बोरा, प्रशांत लोडे, अविनाश गोवारकर, जमीरउल्ला बेग, शौकत अली, शाहीद अली, निसार शेख, फरहान शेख, आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)