शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

जनावरांनाही होतो 'ॲसिडिटी'सारखा त्रास; कारणं अन् उपाय काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:38 IST

पशुपालकांनी करावा वेळीच औषोधपचार : उकिरड्यावरील अन्न खाल्याने होतो आजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाचे विकार अथवा खाण्यामध्ये कमी-जास्त झाले असेल तर माणसाला अॅसिडिटी होते. तसाच काहीसा प्रकार जनावरांच्या अॅसिडिटीच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये अॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे, जी त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम करते, हे प्रामुख्याने त्यांच्या आहारातील बदलांमुळे होते. त्यामुळे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे असते. अन्यथा जनावराचा जीवही जाऊ शकतो. वेळीच पशुवैद्यकांकडून तपासणी करून औषधोपचार करून घेणे आवश्यक असते.

आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते !जनावरांमध्ये अॅसिडिटी होण्याची अनेक कारणे आहे. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे उकिरड्यावर पडलेले काहीही खाणे. मोठ्या जनावरांच्या खाण्यात तर प्लास्टिक, कागददेखील येतो. तर लहान जनावरे उकिरड्यावरील कुजलेले शिळे अन्न खात असल्याने अॅसिडिटी होते. अॅसिडिटीमुळे आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते. त्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो, पोटात वायू तयार होतो. यामुळे पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते. 

पचनसंस्थेत अत्याधिक आम्ल वाढल्याचा परिणामजनावरांना जास्त प्रमाणात धान्य, साखर किंवा इतर कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ दिल्यास, त्यांच्या पोटात आंबायला लागते. ज्यामुळे अॅसिडिटी होते.

आम्लविषार व आम्लपित्त यांत फरक काय ?रक्त आणि इतर द्रवपदार्थांमध्ये आम्लाची पातळी वाढल्यास आल्मविषार होतो. तर जठरात तयार होणारे आम्ल अन्ननलिकेमधून घशाकडे सरकल्यास आम्लपित्त होते. यामुळे पशुपालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.

कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्तलहान जनावरांचा तुलनेत मोठ्या जनावरांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त असते. पण काही विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त दिसून येते.

आम्लविषार झाल्यास जनावराची लक्षणेजनावरांना उलट्या, अतिसार आणि पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. जनावरांना खाद्यपदार्थाचे योग्य प्रकारे पचन होत नाही. पोट फुगते, डोकेदुखी वाढते. खाणे-पिणे कमी होते. श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसतात.

आम्लविषार होण्याची कारणे काय? जनावरांना आम्लविषार होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले खाद्यपदार्थ देणे, पचनसंस्थेतील बदल किंवा काही विशिष्ट आजार असणे. 

"कुजलेले, नासलेले अन्न खाल्यामुळे अनेकवेळा असे विकार होतात. जनावरांना मधुमेह असेल तर अॅसिडिटी होते. त्यामुळे पिण्याचे पाणी योग्य वेळेत देणे तसेच चारा चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे. उकिरड्यावर टाकलेले जेवण जनावरे खाणार नाही, याची काळजी घ्यावी. वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे."- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर