लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाचे विकार अथवा खाण्यामध्ये कमी-जास्त झाले असेल तर माणसाला अॅसिडिटी होते. तसाच काहीसा प्रकार जनावरांच्या अॅसिडिटीच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये अॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे, जी त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम करते, हे प्रामुख्याने त्यांच्या आहारातील बदलांमुळे होते. त्यामुळे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे असते. अन्यथा जनावराचा जीवही जाऊ शकतो. वेळीच पशुवैद्यकांकडून तपासणी करून औषधोपचार करून घेणे आवश्यक असते.
आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते !जनावरांमध्ये अॅसिडिटी होण्याची अनेक कारणे आहे. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे उकिरड्यावर पडलेले काहीही खाणे. मोठ्या जनावरांच्या खाण्यात तर प्लास्टिक, कागददेखील येतो. तर लहान जनावरे उकिरड्यावरील कुजलेले शिळे अन्न खात असल्याने अॅसिडिटी होते. अॅसिडिटीमुळे आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते. त्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो, पोटात वायू तयार होतो. यामुळे पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते.
पचनसंस्थेत अत्याधिक आम्ल वाढल्याचा परिणामजनावरांना जास्त प्रमाणात धान्य, साखर किंवा इतर कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ दिल्यास, त्यांच्या पोटात आंबायला लागते. ज्यामुळे अॅसिडिटी होते.
आम्लविषार व आम्लपित्त यांत फरक काय ?रक्त आणि इतर द्रवपदार्थांमध्ये आम्लाची पातळी वाढल्यास आल्मविषार होतो. तर जठरात तयार होणारे आम्ल अन्ननलिकेमधून घशाकडे सरकल्यास आम्लपित्त होते. यामुळे पशुपालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्तलहान जनावरांचा तुलनेत मोठ्या जनावरांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त असते. पण काही विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त दिसून येते.
आम्लविषार झाल्यास जनावराची लक्षणेजनावरांना उलट्या, अतिसार आणि पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. जनावरांना खाद्यपदार्थाचे योग्य प्रकारे पचन होत नाही. पोट फुगते, डोकेदुखी वाढते. खाणे-पिणे कमी होते. श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसतात.
आम्लविषार होण्याची कारणे काय? जनावरांना आम्लविषार होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले खाद्यपदार्थ देणे, पचनसंस्थेतील बदल किंवा काही विशिष्ट आजार असणे.
"कुजलेले, नासलेले अन्न खाल्यामुळे अनेकवेळा असे विकार होतात. जनावरांना मधुमेह असेल तर अॅसिडिटी होते. त्यामुळे पिण्याचे पाणी योग्य वेळेत देणे तसेच चारा चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे. उकिरड्यावर टाकलेले जेवण जनावरे खाणार नाही, याची काळजी घ्यावी. वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे."- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर