शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:13 IST

आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

ठळक मुद्देपोंभुर्ण्यात धडकला मोर्चा : तालुका निर्मितीनंतर नागरिकांची ऐतिहासिक उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपोभूर्णा : आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.डॉ. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात देवाडा खुर्द येथील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून देवाडा खुर्द गावाचा विचार होतो. मात्र हे गाव शासकीय सोयी सवलती, योजना व विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप गांवकऱ्यांनी केला आहे.मौजा रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ येथील सार्वजनिक प्रयोजनार्थ ठेवलेली जागा महसूल अधिकाºयांनी चिरीमिरी घेऊन पट्टे स्वरुपात दिली. हे पट्टे त्वरित रद्द करून ती जमीन शासन जमा करण्यात यावी, बोगस व धनदांडग्या अतिक्रमणधारकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, गावाच्या निस्तार हक्काची जागा गोठविणारे तत्कालीन उपविभागिय अधिकारी चंद्रभान पराते यांची मालमत्ता व आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यात यावी, महसुली अभिलेखात खोडतोड करून नव्याने अभिलेखात नोंद करणाऱ्या अभिलेख प्रमुखावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, गावातील गुरे-ढोरे चराईच्या जमिनीवर अतिक्रमण करून वन संपदा नष्ट करणाऱ्या महसुली अधिकाºयावर कार्यवाही करण्यात यावी, चालु आर्थिक वर्षात अंधारी नदीवर बंधारा बांधून सिंचनाची समस्या तात्काळ मार्गी लावावी यासह अनेक शेतकरी हिताच्या मागण्या यावेळी मोर्चेकरांनी लावून धरण्यात आल्या.यावेळी बल्लारपूरचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते पवन भगत, पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमिटीचे ओमेश्वर पद्मगिरीवार, युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, पोंभूर्णा शिवसेना नेते गणेश वासलवार, देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार, राजू झोडे, निलकंठ नैताम यांनी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महिला, पुरूष, बेरोजगारांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तणावशेतकºयांची पाळीव जनावरे, बैल-बंड्या व महिलांच्या लाक्षणिक उपस्थितीमुळे या मोर्चाने पोंभूर्ण्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हते. मात्र मोर्चेकरांनी तहसीलदारांचीच भेट घेण्याचा हट्ट धरल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Morchaमोर्चाTahasildarतहसीलदार