शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:13 IST

आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

ठळक मुद्देपोंभुर्ण्यात धडकला मोर्चा : तालुका निर्मितीनंतर नागरिकांची ऐतिहासिक उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपोभूर्णा : आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.डॉ. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात देवाडा खुर्द येथील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून देवाडा खुर्द गावाचा विचार होतो. मात्र हे गाव शासकीय सोयी सवलती, योजना व विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप गांवकऱ्यांनी केला आहे.मौजा रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ येथील सार्वजनिक प्रयोजनार्थ ठेवलेली जागा महसूल अधिकाºयांनी चिरीमिरी घेऊन पट्टे स्वरुपात दिली. हे पट्टे त्वरित रद्द करून ती जमीन शासन जमा करण्यात यावी, बोगस व धनदांडग्या अतिक्रमणधारकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, गावाच्या निस्तार हक्काची जागा गोठविणारे तत्कालीन उपविभागिय अधिकारी चंद्रभान पराते यांची मालमत्ता व आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यात यावी, महसुली अभिलेखात खोडतोड करून नव्याने अभिलेखात नोंद करणाऱ्या अभिलेख प्रमुखावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, गावातील गुरे-ढोरे चराईच्या जमिनीवर अतिक्रमण करून वन संपदा नष्ट करणाऱ्या महसुली अधिकाºयावर कार्यवाही करण्यात यावी, चालु आर्थिक वर्षात अंधारी नदीवर बंधारा बांधून सिंचनाची समस्या तात्काळ मार्गी लावावी यासह अनेक शेतकरी हिताच्या मागण्या यावेळी मोर्चेकरांनी लावून धरण्यात आल्या.यावेळी बल्लारपूरचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते पवन भगत, पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमिटीचे ओमेश्वर पद्मगिरीवार, युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, पोंभूर्णा शिवसेना नेते गणेश वासलवार, देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार, राजू झोडे, निलकंठ नैताम यांनी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महिला, पुरूष, बेरोजगारांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तणावशेतकºयांची पाळीव जनावरे, बैल-बंड्या व महिलांच्या लाक्षणिक उपस्थितीमुळे या मोर्चाने पोंभूर्ण्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हते. मात्र मोर्चेकरांनी तहसीलदारांचीच भेट घेण्याचा हट्ट धरल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Morchaमोर्चाTahasildarतहसीलदार