शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

आनंदवनातून होणार वन महोत्सव प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:19 IST

राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. १ जुलै २०१९ रोजी आनंदवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणीस यांच्या हस्ते वन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उपस्थित राहणार : वन महोत्सवात प्रत्येकांनी सहभागी व्हावे- पालकमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. १ जुलै २०१९ रोजी आनंदवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणीस यांच्या हस्ते वन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी आनंदवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. विकास आमटे, डॉ. शितल आमटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आदी उपस्थित होते. शासनाने विविध विभाग तसेच जनसामान्यांच्या सहभागातून राज्यात १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८२ लाख वृक्षलागवड करून लक्ष पूर्ण केले. २०१७ रोजी वनमहोत्सव कालावधीमध्ये ५ कोटी २७ लक्ष वृक्षलागवड करून ४ कोटीचे लक्ष पूर्ण केले. २०१८ रोजी १५ कोटी २७ लक्ष वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. यंदाचा वन महोत्सव १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ व इतर शासकीय व निमशासकीय विभाग जिल्ह्यातील स्वयंसेवी, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय, एनएसएस व एनसीसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यासाठी १ कोटी ६७ लाखांचे उद्दिष्टयंदा वनमहोत्सव कालावधीमध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याकरिता जिल्ह्यात वनविभाग, इतर यंत्रणा व ग्रामपंचायतींना १ कोटी ६७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वन विभागाचे ८१ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन असून सामाजिक वनीकरण १५ लक्ष तर वन विकास महामंडळाचे १९ लक्ष वृक्ष, वन्यजीव विभाग १ लाख ३० हजार, इतर यंत्रणा ३३ लक्ष आणि ग्रामपंचायतींनी २५ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन केलेले आहे. एकूणच जिल्ह्याला १ कोटी ७८ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन प्राप्त झाले. त्यासाठी १ कोटी ८० लक्ष रोपे तयार करण्यात आली आहेत.आनंदवन घन वन प्रकल्पआनंदवन येथील महारोगी सेवा समितीने मियावाकी हा जपान प्रकल्प उत्तमरित्या विकसित केला आहे. ही बाब विचारात घेऊन वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प शहरी व ग्रामीण भागांमध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.‘ग्रीन आर्मी’ चे सभासद व्हावनविभागाचे उपक्रम सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वनविभागाने ग्रीन आर्मी अर्थात हरित सेना या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याद्वारे वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतलाअसून ग्रीन आर्मी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यात सहभागी होता येणार आहे.वृक्ष लागवड मोहिमेसाठी समित्यांचे गठणवन महोत्सवासाठी ग्राम, तालुका, जिल्हास्तरीय समित्या स्थापन झाल्या. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार तर सदस्य सचिव म्हणून विभागीय वनाधिकारी एस.एल. सोनकुसरे काम पाहत आहेत. वृक्ष लागवडीची कामे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची रूपरेषा व अंमलबजावणीचे नियोजन तयार केले. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन इतर विभागांशी समन्वय व्हावे, रोपांची उपलब्धता व वृक्ष लागवड कार्यक्रमाची माहिती मिळावी, यासाठी तालुका समन्वयक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.