शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अमृत पाणी पुरवठा योजना २३५ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:25 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर करण्यात आला असून राज्य शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. नव्या आराखड्यानुसार ही योजना आता तब्बल २३४ कोटी ९५ लाख १७ हजार ७३५ रुपयांची झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के म्हणजे ११७ कोटी ४७ लाखांचा निधी महानगरपालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसुधारित आराखडा जाहीर : केंद्र सरकार देणार ११७ कोटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर करण्यात आला असून राज्य शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. नव्या आराखड्यानुसार ही योजना आता तब्बल २३४ कोटी ९५ लाख १७ हजार ७३५ रुपयांची झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के म्हणजे ११७ कोटी ४७ लाखांचा निधी महानगरपालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चंद्रपूर शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेकरिता पाईपलाईन टाकण्याच्या हेतूने अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. पण, या रस्त्यांची योग्यरित्या डागडुजी झाली नाही. परिणामी केंद्र शासन पुरस्कृत ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधारी व विरोधी नगर सेवकांमध्येही टिकेचा विषय ठरली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने १३ आॅक्टोबर २०१५ रोजी अमृत अभियानाकरिता आदेश जाहीर केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समिती गठित करून मार्गदर्शकतत्वे तयार केली होती. दरम्यान, या विभागाने १६ मे २०१६ व १२ जुलै २०१६ ला केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांधकामाला सुरूवात केली. २०१६-२०१७ च्या आर्थिक वर्षात या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र चंद्रपुरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उपांगामुळे अनेक बदल करण्यात आले होते. या बदलाला प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. यामुळे सुरु असलेली पायाभूत कामे कामे प्रभावित झाली. नगर विभागाच्या सहसचिव पां. ज. जाधव यांनी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर शहराच्या सुधारीत पाणी पुरवठा सुधारित आकृतीबंधाला शुक्रवारी मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृती आराखड्यानुसार केंद्र सरकारकडून मनपाला ११७ कोटी ४५ लाखांचा निधी मिळणार आहे.राज्यशासन व मनपाचा समान सहभागअमृत पाणी पुरवठा योजनेकरिता २३४ कोटी ९५ लाखांचा निधी खर्च होणार आहे. केंद्र सरकारने ५० टक्के वाटा उचलला तर राज्य शासन व मनपाला प्रत्येकी २५ टक्के प्रकल्प सहभाग देऊन ही योजना पूर्ण करायची आहे. सद्यस्थितीत पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.योजनेचे काम रेंगाळणारअमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कार्यादेश जाहीर केल्यापासून दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले होत. परंतु मनपासमोर उभ्या ठाकलेल्या विविध आव्हानांमुळे या अमृत योजनेची कामे पुन्हा रेंगाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.