शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:36 IST

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशेकडो घरांची पडझड : जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक गावात पाणी, काही मार्गही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील किटाळी, भटाळी यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. प्रशासन मदतीसाठी सज्ज झाले आहे.सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. चारगाव धरण ५० सेंटीमीटरने ओसंडून वाहत आहे. परिणामी इरई धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होत आहे. धरणात २०७.५ मीटरपर्यंत पाण्याचा संचय होऊ शकतो. मात्र धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली नाही. या पाण्यामुळे इरई नदी ओसंडून वाहत आहे. किटाळी व भटाळी गावात पाणी शिरले आहे. धरणाचे सातही दरवाजे उडल्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वत:, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंतही इरई धरणाचे दरवाजे उघडेच होते.नेरी परीसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलानेरी : परिसरात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरी परिसरातील उमा नदीला पूर आला आहे. यामुळे गोदेंडा ,वडसी, विहीरगाव, पडसगाव, लोहारा- बोडधा, सरडपार, म्हसली या गावांचा संपर्क नेरीसोबत तुटलेला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील वडसी येथील अनेक घरांची पडझड झालेली आहे. केवड कुसन मेश्राम, वंदना डोमडू सुर्यवंशी, अस्मत खा पठाण, सुनील हरीदास मेश्राम, रमेश सित्रु आत्राम, अविनाश श्रीहरी मेश्राम यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण