शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:36 IST

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशेकडो घरांची पडझड : जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक गावात पाणी, काही मार्गही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील किटाळी, भटाळी यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. प्रशासन मदतीसाठी सज्ज झाले आहे.सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. चारगाव धरण ५० सेंटीमीटरने ओसंडून वाहत आहे. परिणामी इरई धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होत आहे. धरणात २०७.५ मीटरपर्यंत पाण्याचा संचय होऊ शकतो. मात्र धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली नाही. या पाण्यामुळे इरई नदी ओसंडून वाहत आहे. किटाळी व भटाळी गावात पाणी शिरले आहे. धरणाचे सातही दरवाजे उडल्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वत:, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंतही इरई धरणाचे दरवाजे उघडेच होते.नेरी परीसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलानेरी : परिसरात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरी परिसरातील उमा नदीला पूर आला आहे. यामुळे गोदेंडा ,वडसी, विहीरगाव, पडसगाव, लोहारा- बोडधा, सरडपार, म्हसली या गावांचा संपर्क नेरीसोबत तुटलेला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील वडसी येथील अनेक घरांची पडझड झालेली आहे. केवड कुसन मेश्राम, वंदना डोमडू सुर्यवंशी, अस्मत खा पठाण, सुनील हरीदास मेश्राम, रमेश सित्रु आत्राम, अविनाश श्रीहरी मेश्राम यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण