शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:36 IST

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशेकडो घरांची पडझड : जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक गावात पाणी, काही मार्गही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील किटाळी, भटाळी यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. प्रशासन मदतीसाठी सज्ज झाले आहे.सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. चारगाव धरण ५० सेंटीमीटरने ओसंडून वाहत आहे. परिणामी इरई धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होत आहे. धरणात २०७.५ मीटरपर्यंत पाण्याचा संचय होऊ शकतो. मात्र धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली नाही. या पाण्यामुळे इरई नदी ओसंडून वाहत आहे. किटाळी व भटाळी गावात पाणी शिरले आहे. धरणाचे सातही दरवाजे उडल्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वत:, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंतही इरई धरणाचे दरवाजे उघडेच होते.नेरी परीसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलानेरी : परिसरात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरी परिसरातील उमा नदीला पूर आला आहे. यामुळे गोदेंडा ,वडसी, विहीरगाव, पडसगाव, लोहारा- बोडधा, सरडपार, म्हसली या गावांचा संपर्क नेरीसोबत तुटलेला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील वडसी येथील अनेक घरांची पडझड झालेली आहे. केवड कुसन मेश्राम, वंदना डोमडू सुर्यवंशी, अस्मत खा पठाण, सुनील हरीदास मेश्राम, रमेश सित्रु आत्राम, अविनाश श्रीहरी मेश्राम यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण