शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:59 PM

बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु असले, तरी आजही पाहिजे तशी जनजागृती झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागामध्ये काही बालकसुद्धा तंबाखूच्या आहारी गेले आहे. त्यामुळे शाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आता बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.भारतात दरवर्षी तंबाखुमुळे १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात हे प्रमाण ७२ हजार एवढे आहे. तर राज्यात दररोज ५२९ मुले तंबाखूच्या वापरास प्रारंभ करत असल्याचे एका अहवालामधून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तंबाखूच्या विळख्यातून प्रत्येकांना काढणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीनिमित्ताने राज्यातील सर्व शाळा, कॉलेजमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. त्यानंतर आता बालकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :children's dayबालदिन