शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण कायम ठेवण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्यामुळे बुधवारी चंद्रपूर ...

चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्यामुळे बुधवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सहविचार बैठकीत सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटले. आरक्षणासाठी भविष्यातील आंदोलनाची दिशा काय राहील, याबाबत विचारमंथनही झाले.

४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविले आहे. याबाबतची राज्य सरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने २८ मे रोजी फेटाळली आहे. राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन न्यायालयात ओबीसींची बाजू मांडली असती तर आरक्षण रद्द झाले नसते, असा दावा सहविचार बैठकीत ओबीसी नेत्यांनी केला आहे. राज्य मागास आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, रवींद्र शिंदे, संदिप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, बबनराव फंड, महासचिव सचिन राजुरकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, जि. प. सदस्य देवराव भोंगळे, डॉ. सतीश वारजुरकर, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रकाश देवतळे, अविनाश पाल, सुधाकर रोहनकार, प्रा. अनिल शिंदे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. शरद वानखेडे, शाम लेडे, रणजित डवरे, बादल बेले, चंद्रकांत गुरू, नीलेश खरवडे, गोविंदा पोडे, सुनील फरकडे, गणेश आवारी, उमाकांत धांडे, मोरेश्वर लोहे, नितीन गोहणे, गणपती मोरे, तुलसीदास भुरसे, बंडू डाखरे व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक दिनेश चोखारे तर संचालन श्याम लेडे यांनी केले. सचिन राजूरकर यांनी आभार मानले.

सहविचार सभेत काय चर्चा झाली?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द न होता अबाधित ठेवण्याची दक्षता राज्य शासनाने घ्यावी. केंद्र सरकाने कायदा करून ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.