शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात ...

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने प्रवासी बसेसना मालवाहतूक बसमध्ये रूपांतरित करून आर्थिक भार पेलण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू कोरोनावर मात करून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये प्रवासाचे एकमेव साधन एसटी आहे. त्यामुळे या भागाकडेही महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता लोकवाहिनी असलेली एस.टी. पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

-

बाॅक्स

प्रवाशांची अडचण झाली दूर

जिल्ह्यातील सर्वच मार्गांवरील एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-घुग्घुस, वणी, चंद्रपूर-गडचिरोली, ब्रह्मपुरी या मार्गांवर नियमित आणि वेळेवर बस सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून आगारांनाही आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र ज्या मार्गावर बस धावत नाहीत, त्या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

-

कोट

राजुरा येथून गोवरी, मार्डा येथील बस सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लाॅकडाऊनमध्ये ही बस बंद होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही बस वेळेवर आणि नियमित सोडावी.

- गोविल इटणकर, गोवरी

---

कोट

नागभीड येथून व्याहाड तसेच इतर गावांसाठी बससेवा सुरू झाली आहे. अद्यापही काही गावांत बस जात नाही. त्यामुळे याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बस नियमितपणे सुरू करावी. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस अधिकाधिक सोडण्याचा प्रयत्न करावा.

- नारायण पाचपोर, नागभीड

---

कोट

---

लाॅकडाऊननंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगारातून नियमित बसेस सोडल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- सचिन डफरे

आगारप्रमुख, चंद्रपूर

---

बाॅक्स

सर्वच आगारांची बससेवा रुळांवर

चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, वरोरा, राजुरा, चिमूर असे आगार असून ब्रह्मपुरी आगार गडचिरोली विभागांतर्गत आहे. दरम्यान, चंद्रपूर विभागातील सर्वच आगारांतील बसेस रुळावर आल्या असून सर्वच बस नियमित धावत आहे. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.