शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात ...

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने प्रवासी बसेसना मालवाहतूक बसमध्ये रूपांतरित करून आर्थिक भार पेलण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू कोरोनावर मात करून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये प्रवासाचे एकमेव साधन एसटी आहे. त्यामुळे या भागाकडेही महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता लोकवाहिनी असलेली एस.टी. पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

-

बाॅक्स

प्रवाशांची अडचण झाली दूर

जिल्ह्यातील सर्वच मार्गांवरील एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-घुग्घुस, वणी, चंद्रपूर-गडचिरोली, ब्रह्मपुरी या मार्गांवर नियमित आणि वेळेवर बस सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून आगारांनाही आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र ज्या मार्गावर बस धावत नाहीत, त्या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

-

कोट

राजुरा येथून गोवरी, मार्डा येथील बस सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लाॅकडाऊनमध्ये ही बस बंद होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही बस वेळेवर आणि नियमित सोडावी.

- गोविल इटणकर, गोवरी

---

कोट

नागभीड येथून व्याहाड तसेच इतर गावांसाठी बससेवा सुरू झाली आहे. अद्यापही काही गावांत बस जात नाही. त्यामुळे याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बस नियमितपणे सुरू करावी. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस अधिकाधिक सोडण्याचा प्रयत्न करावा.

- नारायण पाचपोर, नागभीड

---

कोट

---

लाॅकडाऊननंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगारातून नियमित बसेस सोडल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- सचिन डफरे

आगारप्रमुख, चंद्रपूर

---

बाॅक्स

सर्वच आगारांची बससेवा रुळांवर

चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, वरोरा, राजुरा, चिमूर असे आगार असून ब्रह्मपुरी आगार गडचिरोली विभागांतर्गत आहे. दरम्यान, चंद्रपूर विभागातील सर्वच आगारांतील बसेस रुळावर आल्या असून सर्वच बस नियमित धावत आहे. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.