शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वर्धा नदीच्या पुरामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा ! इरईचे सात दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:12 IST

Chandrapur : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागला. त्यातच इरई धरणातील जलपातळी २०७.३२५ मीटरने वाढली. सकाळी ७:३० वाजता सात दरवाजे ०.२५ मीटरने उघडून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिमूर शहरात गुरुदेव वार्डातील अनेक घरात पाणी शिरले. यात वसंत रामगुंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घर मातीचे असल्याने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घराची भिंत कोसळली

सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्र. १७ येथील शेतकरी अरविंद देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी ६ ते ७वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. दसरा चौकातील देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली.

विद्यार्थ्यांची अडचण

वर्धा नदीला पूर आल्याने भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. चंद्रपूर-कोरपना तालुक्याला जाण्याचा वळण मार्गही बंद आहे. त्यामुळे कोरपना, कवठाळा, इरई, मारडा व पेलोरा बससेवा प्रभावित झाली आहे. विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील शाळा व महाविद्यालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला.

किल्ल्याचा घुमट कोसळल्याने घरांचे नुकसान

बल्लारपूर : पावसाने येथील गोंडकालीन किल्ल्याचा बुरुज कोसळल्याने परिसरात नागरिकांच्या सुरक्षा भिंती व घरांचे नुकसान झाले. बसपाचे किशनकुमार केशकर यांनी याबाबत पुरातत्त्व विभाग व नगर परिषदला माहिती देऊन दुरुस्तीची मागणी केली. दरवर्षी पावसाने ऐतिहासिक किल्ल्याची भिंत व बुरुज कोसळतात. परंतु, दुरुस्ती होत नसल्याने बाजूच्या घरांना धोका उ‌द्भवतो. अनेक ठिकाणी किल्ल्याच्या भिंतींना तडे गेले आहेत. यातून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

कोसारातील एकतानगरात घरांभोवती पाणी

चंद्रपूरच्या कोसारा परिसरातील एकतानगरात एका बिल्डरच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. नामदेव तडसे, आसेकर, वरारकर, खामनकर यांच्या घरांभोवती पाणी साचले. घरातून बाहेर निघणे कठीण झाले. नामदेव तडसे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात जायची वेळ आल्यास बाहेर निघायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन ये-जा करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नदीकाठावर जाण्यास प्रशासनाकडून मनाई

दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव व माना येथील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जटपुरा गेट परिसरात इमारतीचा जीर्ण भाग कोसळल्याने महिला जखमी

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने महिला जखमी झाली. सुनीता लोखंडे असे जखमीचे नाव आहे. महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबूपेठ परिसरातही काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर