शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीच्या पुरामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा ! इरईचे सात दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:12 IST

Chandrapur : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागला. त्यातच इरई धरणातील जलपातळी २०७.३२५ मीटरने वाढली. सकाळी ७:३० वाजता सात दरवाजे ०.२५ मीटरने उघडून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिमूर शहरात गुरुदेव वार्डातील अनेक घरात पाणी शिरले. यात वसंत रामगुंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घर मातीचे असल्याने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घराची भिंत कोसळली

सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्र. १७ येथील शेतकरी अरविंद देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी ६ ते ७वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. दसरा चौकातील देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली.

विद्यार्थ्यांची अडचण

वर्धा नदीला पूर आल्याने भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. चंद्रपूर-कोरपना तालुक्याला जाण्याचा वळण मार्गही बंद आहे. त्यामुळे कोरपना, कवठाळा, इरई, मारडा व पेलोरा बससेवा प्रभावित झाली आहे. विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील शाळा व महाविद्यालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला.

किल्ल्याचा घुमट कोसळल्याने घरांचे नुकसान

बल्लारपूर : पावसाने येथील गोंडकालीन किल्ल्याचा बुरुज कोसळल्याने परिसरात नागरिकांच्या सुरक्षा भिंती व घरांचे नुकसान झाले. बसपाचे किशनकुमार केशकर यांनी याबाबत पुरातत्त्व विभाग व नगर परिषदला माहिती देऊन दुरुस्तीची मागणी केली. दरवर्षी पावसाने ऐतिहासिक किल्ल्याची भिंत व बुरुज कोसळतात. परंतु, दुरुस्ती होत नसल्याने बाजूच्या घरांना धोका उ‌द्भवतो. अनेक ठिकाणी किल्ल्याच्या भिंतींना तडे गेले आहेत. यातून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

कोसारातील एकतानगरात घरांभोवती पाणी

चंद्रपूरच्या कोसारा परिसरातील एकतानगरात एका बिल्डरच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. नामदेव तडसे, आसेकर, वरारकर, खामनकर यांच्या घरांभोवती पाणी साचले. घरातून बाहेर निघणे कठीण झाले. नामदेव तडसे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात जायची वेळ आल्यास बाहेर निघायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन ये-जा करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नदीकाठावर जाण्यास प्रशासनाकडून मनाई

दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव व माना येथील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जटपुरा गेट परिसरात इमारतीचा जीर्ण भाग कोसळल्याने महिला जखमी

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने महिला जखमी झाली. सुनीता लोखंडे असे जखमीचे नाव आहे. महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबूपेठ परिसरातही काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर