शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

वर्धा नदीच्या पुरामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा ! इरईचे सात दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:12 IST

Chandrapur : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागला. त्यातच इरई धरणातील जलपातळी २०७.३२५ मीटरने वाढली. सकाळी ७:३० वाजता सात दरवाजे ०.२५ मीटरने उघडून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिमूर शहरात गुरुदेव वार्डातील अनेक घरात पाणी शिरले. यात वसंत रामगुंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घर मातीचे असल्याने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घराची भिंत कोसळली

सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्र. १७ येथील शेतकरी अरविंद देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी ६ ते ७वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. दसरा चौकातील देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली.

विद्यार्थ्यांची अडचण

वर्धा नदीला पूर आल्याने भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. चंद्रपूर-कोरपना तालुक्याला जाण्याचा वळण मार्गही बंद आहे. त्यामुळे कोरपना, कवठाळा, इरई, मारडा व पेलोरा बससेवा प्रभावित झाली आहे. विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील शाळा व महाविद्यालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला.

किल्ल्याचा घुमट कोसळल्याने घरांचे नुकसान

बल्लारपूर : पावसाने येथील गोंडकालीन किल्ल्याचा बुरुज कोसळल्याने परिसरात नागरिकांच्या सुरक्षा भिंती व घरांचे नुकसान झाले. बसपाचे किशनकुमार केशकर यांनी याबाबत पुरातत्त्व विभाग व नगर परिषदला माहिती देऊन दुरुस्तीची मागणी केली. दरवर्षी पावसाने ऐतिहासिक किल्ल्याची भिंत व बुरुज कोसळतात. परंतु, दुरुस्ती होत नसल्याने बाजूच्या घरांना धोका उ‌द्भवतो. अनेक ठिकाणी किल्ल्याच्या भिंतींना तडे गेले आहेत. यातून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

कोसारातील एकतानगरात घरांभोवती पाणी

चंद्रपूरच्या कोसारा परिसरातील एकतानगरात एका बिल्डरच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. नामदेव तडसे, आसेकर, वरारकर, खामनकर यांच्या घरांभोवती पाणी साचले. घरातून बाहेर निघणे कठीण झाले. नामदेव तडसे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात जायची वेळ आल्यास बाहेर निघायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन ये-जा करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नदीकाठावर जाण्यास प्रशासनाकडून मनाई

दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव व माना येथील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जटपुरा गेट परिसरात इमारतीचा जीर्ण भाग कोसळल्याने महिला जखमी

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने महिला जखमी झाली. सुनीता लोखंडे असे जखमीचे नाव आहे. महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबूपेठ परिसरातही काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर