शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

ऐन गणेशोत्सवात भजनी मंडळांचा गजर लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:32 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : गणेशोत्सवात दरवर्षी भजनाच्या माध्यमातून रात्र गजर होत होता. गणेश चतुर्थीपासून भजनाची सुरुवात व्हायची ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बल्लारपूर : गणेशोत्सवात दरवर्षी भजनाच्या माध्यमातून रात्र गजर होत होता. गणेश चतुर्थीपासून भजनाची सुरुवात व्हायची ती विसर्जनापर्यंत. गावागावांतील भजनी मंडळांकडे घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांकडून निमंत्रण यायचे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे भजनी मंडळांचा व गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे. भजनी मंडळ कसे टिकवून ठेवावे, हा प्रश्न भजनी मंडळींपुढे ठाकला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील ३३ गावांत ४० च्या वर भजनी मंडळे आहेत. बहुतेक भजनी मंडळ समाजसेवा म्हणून भजनाची परंपरा जोपासत आहे. भजन परंपरा गेली कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. दोन वर्षांपासून घरगुती गणेश उत्सवात व सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी भजनी मंडळांना बोलावणे बंद केले आहे. प्रशासनाने यावर्षीसुद्धा कार्यक्रमांवर बंदी घालत अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. यामुळे बऱ्याच मंडळांनी भजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. साध्या पद्धतीने आरती करून गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक भजनी मंडळांनी भर दिला आहे. काही ठिकाणी घरगुती गणपतीसमोर सामाजिक अंतर ठेवून भजनी मंडळ गणेशभक्तांचा उत्साह वाढवीत आहे, अशी माहिती तुकडोजी महाराज भजनी मंडळाचे सदस्य भाऊराव लेडांगे, तबलावादक खुशाल पोयामकर यांनी दिली.

कोट

श्री गणेश उत्सवात भजनाचे कार्यक्रम बंद झाल्यामुळे भजनाचे साहित्य घेणाऱ्यांची व दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या कमी झाली. उत्सवाच्या आधी भजन मंडळ सर्व साहित्य दुरुस्त करायची. भजनाचे कार्यक्रमच नाही, तर साहित्य दुरुस्त करणेही थांबले. याचा फटका संगीत साहित्य विकणाऱ्या व दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराला बसला आहे.

- राकेश तग्रपवार, तबला मेकर्स, बामणी

गणेश उत्सव गणपतीसमोर भजनाचा गजर झाल्याशिवाय अपूर्ण वाटतो. गणेश मंडळांनाही समाधान वाटत नाही. या माध्यमातून भक्तीची भावना जागृत होते; परंतु कोरोना संकटामुळे यावर निर्बंध आले आहे. त्याचे आम्ही पालन करीत आहोत.

- दिलीप दातारकर, गुरुकृपा भजन मंडळ, बल्लारपूर

130921\img-20210912-wa0358.jpg

गुरुकृपा भजन मंडळ