शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 11:29 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रपूर : पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत नुकसान झाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही फटका बसला. मात्र, राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात आले नसल्याने पूरग्रस्त अजूनही वाऱ्यावर आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. गुरुवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, चंद्रपूर शहरालगतच्या नदीकाठावर वस्त्या तयार झाल्या. या भागात बेकायदेशीर प्लॉट विक्रीही केली जाते. पूरग्रस्त भागात वस्त्याच उभा व्हायला नको, अशी सूचना देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चंद्रपूर, परभणी, लातूर, अकोला या चार मनपांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. पायाभूत सुविधांचाही अभाव असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ हजारऐवजी १० हजारांची मदत द्यावी व वेकोलीच्या ओव्हर बर्डनविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचनाही विरोधी पक्षनेते पवार यांनी दिल्या. दरम्यान, पूरग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर व महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे सरकार सोबत गेलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पवारांनी भेट दिली.

उणेदुणे काढण्यात अर्थ नाही

राजकारणात कुणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा सर्वांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला. माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही देखावा करीत नाही, प्रत्यक्ष मदत करतो. बडबड करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या. केंद्रात आणि राज्यातही भाजपचेच तुमचेच सरकार आहे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस