शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 10:55 IST

नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे आजार

आशिष रॉय

नागपूर : चंद्रपूर शहरातील जल व वायुप्रदूषणाला केवळ महानिर्मितीचा औष्णिक वीज प्रकल्पच कारणीभूत नाही. तडाली एमआयडीसीमधील चार स्पंज आयर्न प्रकल्पही चंद्रपूरमधील वायू विषारी करीत आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. सर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे विविध आजार नागरिकांवर हल्लाबोल करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोजलेल्या आरएसपीएम स्तरावरून संबंधित चार स्पंज आयर्न प्रकल्पामुळे किती घातक प्रदूषण होत आहे, हे स्पष्ट होते. तडाली एमआयडीसी येथील आरएसपीएम स्तर चंद्रपूर एमआयडीसी व चंद्रपूर शहरातील स्तरापेक्षा खूप जास्त आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हे चार उद्योग उभारले गेले. त्यावेळी या उद्योगांना परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु देशमुख यांनी दुर्लक्ष केले. तडाली एमआयडीसीजवळच्या सहा-सात गावांमधील नागरिकांना वायुप्रदूषणामुळे श्वसनासंबंधीचे विविध आजार होत आहेत. चारही उद्योग वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांना केवळ नोटीस बजावते किंवा बँक हमी जप्त करते; परंतु ठोस कारवाई केली जात नाही.

पर्यावरणप्रेमी बंडू धोत्रे यांनी तडाली येथील उद्योग ग्रामीण भागातील प्रदूषण वाढवित असल्याचा आरोप केला. गावातील अनेक नागरिक या उद्योगांमध्ये काम करतात. त्यामुळे कोणीच लेखी तक्रार देत नाही. परिणामी, उद्योगांवर कारवाई होण्यासाठी काहीच करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी विश्वास बुग्गेवार यांनी त्यांच्या पालकांना श्वसनाचे आजार झाल्याची माहिती दिली, तसेच स्वत:लाही कफ व सर्दी असल्याचे सांगितले. गेल्या २० वर्षांत शेतीचे उत्पादन कमी झाले आहे. कापूस काळा पडतो. त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शेती करणे सोडायचे आहे; पण चारही कंपन्या नोकरी देण्यास तयार नाहीत. या कंपन्या गावकऱ्यांसाठी शाप आहेत, असेही बुग्गेवार म्हणाले.

आरएसपीएम स्तर (मायक्रोग्रॅममध्ये)

वर्ष - चंद्रपूर एमआयडीसी - चंद्रपूर एसआरओ - तडाली एमआयडीसी

२०१७-१८ - ७४ - ९० - ११०

२०१८-१९ - ९० - ८९ - १०७

२०१९-२० - ८९ - ६८ - १०६

(मंजुरीयोग्य स्तर - ६०)

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण