शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 10:55 IST

नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे आजार

आशिष रॉय

नागपूर : चंद्रपूर शहरातील जल व वायुप्रदूषणाला केवळ महानिर्मितीचा औष्णिक वीज प्रकल्पच कारणीभूत नाही. तडाली एमआयडीसीमधील चार स्पंज आयर्न प्रकल्पही चंद्रपूरमधील वायू विषारी करीत आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. सर्दी, अस्थमा, कफ यासह श्वसनाचे विविध आजार नागरिकांवर हल्लाबोल करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोजलेल्या आरएसपीएम स्तरावरून संबंधित चार स्पंज आयर्न प्रकल्पामुळे किती घातक प्रदूषण होत आहे, हे स्पष्ट होते. तडाली एमआयडीसी येथील आरएसपीएम स्तर चंद्रपूर एमआयडीसी व चंद्रपूर शहरातील स्तरापेक्षा खूप जास्त आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हे चार उद्योग उभारले गेले. त्यावेळी या उद्योगांना परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु देशमुख यांनी दुर्लक्ष केले. तडाली एमआयडीसीजवळच्या सहा-सात गावांमधील नागरिकांना वायुप्रदूषणामुळे श्वसनासंबंधीचे विविध आजार होत आहेत. चारही उद्योग वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांना केवळ नोटीस बजावते किंवा बँक हमी जप्त करते; परंतु ठोस कारवाई केली जात नाही.

पर्यावरणप्रेमी बंडू धोत्रे यांनी तडाली येथील उद्योग ग्रामीण भागातील प्रदूषण वाढवित असल्याचा आरोप केला. गावातील अनेक नागरिक या उद्योगांमध्ये काम करतात. त्यामुळे कोणीच लेखी तक्रार देत नाही. परिणामी, उद्योगांवर कारवाई होण्यासाठी काहीच करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी विश्वास बुग्गेवार यांनी त्यांच्या पालकांना श्वसनाचे आजार झाल्याची माहिती दिली, तसेच स्वत:लाही कफ व सर्दी असल्याचे सांगितले. गेल्या २० वर्षांत शेतीचे उत्पादन कमी झाले आहे. कापूस काळा पडतो. त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शेती करणे सोडायचे आहे; पण चारही कंपन्या नोकरी देण्यास तयार नाहीत. या कंपन्या गावकऱ्यांसाठी शाप आहेत, असेही बुग्गेवार म्हणाले.

आरएसपीएम स्तर (मायक्रोग्रॅममध्ये)

वर्ष - चंद्रपूर एमआयडीसी - चंद्रपूर एसआरओ - तडाली एमआयडीसी

२०१७-१८ - ७४ - ९० - ११०

२०१८-१९ - ९० - ८९ - १०७

२०१९-२० - ८९ - ६८ - १०६

(मंजुरीयोग्य स्तर - ६०)

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण