शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकासापासून उपेक्षित गेवरा परिसराला हवा न्याय

By admin | Updated: October 29, 2015 01:35 IST

सावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही.

प्रकाश काळे गेवरासावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही. किंवा कुणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सुटणे कठीण आहे.प्रत्येक ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा त्याचसोबत सेवा सहकारी सोसायट्या इत्यादीसाठी होणाऱ्या निवडणूकांमध्ये मात्र वरिष्ठ स्तरापासून ते गावस्तरापर्यंतचे सर्वच नेते व स्वघोषित कार्यकर्ते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.प्रत्येक मतदाराला प्रलोभीत करीत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून तर सर्वच स्थानिक समस्यांचे ओझे डोक्यावर घेवून निवडणुकात फिरत असतात. एकदाच्या निवडणूका संपल्या की दिलेले सर्व आश्वासने, प्रलोभने तिथेच विसरून निवांत पाच वर्षांपर्यंत स्वत:चा विकास करण्यासाठी धडपडताना दिसतात.हीच परिस्थिती या भागातील दोन्ही पंचायत समिती क्षेत्र निमगाव-विहिरगाव तसेच पालेबारसा-अंतरगाव आणि दोन्ही संबंधीत जिल्हा परिषद क्षेत्रातील करोली आकापूर, खानाबाद, गेवरा खुर्द, गेवरा बुज, विहीरगाव, बोरमाळा, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, बारसागड, मेहा सायखेडा, उसरपारचक, सावंगी दीक्षित, उसरपार तुकूम, पालेबारसा, जनकापूर तुकूम, जनकापूर रिठ, भानापूर, आसोला, अंतरगाव, गायडोंगरी, निमगाव या गावातील आहे. विकासाचा पॅरामीटर बघितल्यास भीषण वास्तव समोर येते. यापूर्वी सुद्धा लोकमतने या २४ ही गावांची वास्तविकता समोर आणली. त्याबाबतचे निवेदन विहीरगाव येथील जनतेच्या पुढाकाराने २४ गावाच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आले. निवेदनातून शेतकऱ्यांच्या वास्तविकतेची परिस्थिती नमूद करून या भागात अत्यल्प झालेल्या पावसाने रोवणी होवू शकली नाही. जे पीक जगले त्यांना रोगांनी संपविले. पिकांसाठी धडपडणारा शेतकरी आता कर्जबाजारी झाला असून दुष्काळ परिस्थितीस सामोरे जात आहे. गावनिहाय सर्व्हेक्षण करून वस्तुनिष्ठ शेतकऱ्यांची स्थिती समजून घेवून दुष्काळग्रस्त गावे जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक आमदार हे विरोधी पक्षाचे असून या सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात हा भाग येत असल्याने राज्य आणि केंद्रात समांतर सत्ता असताना स्थानिक आमदार नेहमी विरोधी पक्षाचाच असल्याची परंपरा आहे. हेही एक राजकीयदृष्ट्या या भागाचे उपेक्षेचे कारण ठरू शकते. लोकनेता कोणत्याही पक्षाचा असावा, सत्ता कोणत्याही पक्षाची असावी. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. परंतु या भागातील जनतेच्या नशिबी हे भाग्य नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप याच राजयुद्धामध्ये या भागातील मतदार शेतकरी कायम मारल्या जात आहे. या भागातील जनतेचे जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे. शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी पुरेशी व्यवस्था नाही. पालेबारसा अंतरगाव परिसरात आसोलामेंढा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. याचा या परिसरातील एकाही गावाला सिंचनाच्या दृष्टीने फायदा नाही. उलट आणेवारीवर परिणाम होतो. निमगाव-विहीरगाव पंचायत समिती क्षेत्रातील गावांना राजस्व मंडळातील व्याहाडमधील वाघोली बुटी सिंचन प्रकल्पाचा मार खावा लागतो. त्यामुळे येथेही आणेवारीवर परिणाम होतो. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी या भागातील राजकीय पक्षांची उणीव भासावी, हे दुर्दैवच.