शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विकासापासून उपेक्षित गेवरा परिसराला हवा न्याय

By admin | Updated: October 29, 2015 01:35 IST

सावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही.

प्रकाश काळे गेवरासावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही. किंवा कुणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सुटणे कठीण आहे.प्रत्येक ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा त्याचसोबत सेवा सहकारी सोसायट्या इत्यादीसाठी होणाऱ्या निवडणूकांमध्ये मात्र वरिष्ठ स्तरापासून ते गावस्तरापर्यंतचे सर्वच नेते व स्वघोषित कार्यकर्ते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.प्रत्येक मतदाराला प्रलोभीत करीत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून तर सर्वच स्थानिक समस्यांचे ओझे डोक्यावर घेवून निवडणुकात फिरत असतात. एकदाच्या निवडणूका संपल्या की दिलेले सर्व आश्वासने, प्रलोभने तिथेच विसरून निवांत पाच वर्षांपर्यंत स्वत:चा विकास करण्यासाठी धडपडताना दिसतात.हीच परिस्थिती या भागातील दोन्ही पंचायत समिती क्षेत्र निमगाव-विहिरगाव तसेच पालेबारसा-अंतरगाव आणि दोन्ही संबंधीत जिल्हा परिषद क्षेत्रातील करोली आकापूर, खानाबाद, गेवरा खुर्द, गेवरा बुज, विहीरगाव, बोरमाळा, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, बारसागड, मेहा सायखेडा, उसरपारचक, सावंगी दीक्षित, उसरपार तुकूम, पालेबारसा, जनकापूर तुकूम, जनकापूर रिठ, भानापूर, आसोला, अंतरगाव, गायडोंगरी, निमगाव या गावातील आहे. विकासाचा पॅरामीटर बघितल्यास भीषण वास्तव समोर येते. यापूर्वी सुद्धा लोकमतने या २४ ही गावांची वास्तविकता समोर आणली. त्याबाबतचे निवेदन विहीरगाव येथील जनतेच्या पुढाकाराने २४ गावाच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आले. निवेदनातून शेतकऱ्यांच्या वास्तविकतेची परिस्थिती नमूद करून या भागात अत्यल्प झालेल्या पावसाने रोवणी होवू शकली नाही. जे पीक जगले त्यांना रोगांनी संपविले. पिकांसाठी धडपडणारा शेतकरी आता कर्जबाजारी झाला असून दुष्काळ परिस्थितीस सामोरे जात आहे. गावनिहाय सर्व्हेक्षण करून वस्तुनिष्ठ शेतकऱ्यांची स्थिती समजून घेवून दुष्काळग्रस्त गावे जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक आमदार हे विरोधी पक्षाचे असून या सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात हा भाग येत असल्याने राज्य आणि केंद्रात समांतर सत्ता असताना स्थानिक आमदार नेहमी विरोधी पक्षाचाच असल्याची परंपरा आहे. हेही एक राजकीयदृष्ट्या या भागाचे उपेक्षेचे कारण ठरू शकते. लोकनेता कोणत्याही पक्षाचा असावा, सत्ता कोणत्याही पक्षाची असावी. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. परंतु या भागातील जनतेच्या नशिबी हे भाग्य नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप याच राजयुद्धामध्ये या भागातील मतदार शेतकरी कायम मारल्या जात आहे. या भागातील जनतेचे जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे. शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी पुरेशी व्यवस्था नाही. पालेबारसा अंतरगाव परिसरात आसोलामेंढा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. याचा या परिसरातील एकाही गावाला सिंचनाच्या दृष्टीने फायदा नाही. उलट आणेवारीवर परिणाम होतो. निमगाव-विहीरगाव पंचायत समिती क्षेत्रातील गावांना राजस्व मंडळातील व्याहाडमधील वाघोली बुटी सिंचन प्रकल्पाचा मार खावा लागतो. त्यामुळे येथेही आणेवारीवर परिणाम होतो. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी या भागातील राजकीय पक्षांची उणीव भासावी, हे दुर्दैवच.