शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

कोरोनाच्या सावटात मशागतीचीे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगामावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचे थैमान सुरु आहे. राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती पुढे नियंत्रणात आली नाही, तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटात शेती मशागतीचे कामे सुरू केली आहे.ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे. शेती पेरणीसाठी सज्ज करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करतात. यासाठी आणखी दीड महिना वेळ आहे.परंतु येत्या दीड महिन्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का, या प्रश्नाचे उत्तर अद्यापतरी कुणीही देत नाही. हंगाम जवळ आल्याने शेतकºयांची लगबग वाढली आहे. मे महिन्यात जर कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २० मे नंतर शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यावेळी जर कोरोना आटोक्यात आला नाही तर सोशल डिस्टंन्सिगची मोठी समस्या उद्भवणार आहे.दुसरीकडे कृषी विक्रेतेही चिंतेत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांकडून मागणी होणाºया वेगवेगळ्या दर्जाचे, कंपनीचे बियाणे व खते कृषी विक्रेते उपलब्ध करुन देतात. मात्र लॉकडाऊन असाच कायम राहीला आणि वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन आणखी तीव्र करण्यात आला. तर कंपन्यांकडून खते व बियाणांचा पुरवठा होईल का, अशी भीती कृषी विक्रेत्यांनासध्या सतावत आहे.संकटांची मालिका सुरूचचालू वर्ष शेतकºयांसाठी वाईट ठरत आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरी अवकाळी पाऊस थांबलेला नाही. मागील हंगामात दिवाळीनंतरही अवकाळी पाऊस सुरुच होता. त्यामुळे सोयाबिन पिकाचे नुकसान झाले. कापूस, भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला. या संकटातून शेतकरी सावरत असतानाच, कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटाचे लवकर सुटका मिळावी अशी प्रार्थना सध्याशेतकरी करीत आहेत.कापूस विक्रीसाठी शेतकरी चिंतेतकोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, देशपातळीवर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. खासगी जिनिंगही बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आहे. तो विकल्याशिवाय हाती पैसे येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामासाठी लागणारे खते-बियाणे खरेदींची अडचण वाढली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती