शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणासाठी कृषी पथक शेतशिवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:19 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले. आदेशानुसार बुधवारपासून महसूल व कृषी विभागाचे पथक शेतशिवारात ...

ठळक मुद्देतोंडचा घास हिरावला : अवकाळी पाऊस व गारपीट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले. आदेशानुसार बुधवारपासून महसूल व कृषी विभागाचे पथक शेतशिवारात जाऊन पिकांचे सर्व्हेक्षण करीत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला होता. ढगाळ वातावरण कायम होते. अशातच सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही तालुक्यात गारपीटीसह पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अवकाळ पाऊस गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सिंदेवाही तालुक्यातील एका गावात, वरोरा तालुक्यात ३० गावामध्ये, भद्रावती तालुक्यात ४ गावांमध्ये तर राजुरा तालुक्यात ३ गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती आहे. गारपीटीमुळे धोपटाळा येथे एक गाय व वासरु मृत्यूमुखी पडले. मुधोली, वडाळा, आष्टा, मानोरा, मारडा, धिडसी, निरळी, चिकणी, माढेळी, टेंभुर्डा आदी गावांमध्ये गारपीट झाली. तर वीज कोसळून महालगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव या गावांसह ३० गावातील पीक उद्धवस्त झाली आहेत. रबी पिकांमध्ये हरभरा व गहू पिकाला सर्वाधिक फटका बसला असून गहू पीक पूर्णत: जमिनीवर झोपून गेले तर हरभऱ्याचे दाणे फुटून पडले आहेत. तर भाजीपाला व आंब्याचा बहारही जमीनदोस्त झाला आहे. शेतामध्ये उभ्या झाडांना कापूस दिसेनासे झाले आहे. बल्लापूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, कोठारी, काटवली (बामणी), इटोली, मानोरा, कवडजी, मोहाळी, कोर्टिमक्ता येथील शेतकºयांना मोठ्या फटका बसला आहे. यंदा वारंवार शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप होत आहे. खरिपात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पीक उद्ध्वस्त झाले होते.राजुरा तालुक्यात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्तगोवरी : सोमवार आणि मंगळवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने कापूस, गहू, हरभरा, ज्वारी ही पिके पुर्णत: भुईसपाट झाली आहे. राजुरा तालुक्याला वादळाचा चांगलाच फटका बसला असून शेतकरी पार कोलमडून पडला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतीचे गणित चुकले. उसनवारी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी कसीबशी शेती केली. मात्र यावर्षी बोंडअळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणले. शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला असतानाच दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने राजुरा तालुक्याला झोडपून काढले. पीक निघायला फक्त काही दिवसाचा अवधी असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मारडा, गोवरी, पोवनी, साखरी, पेल्लोरा, धिडशी, वरोडा, चार्ली, निर्ली, कढोली, बाबापूर, चिंचोली परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.तिघांचे पथकजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनीही आपल्या यंत्रणेला तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक आणि तांत्रिक म्हणून कृषी सहायक या तिघांचे पथक प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शिवारात जात आहे. येत्या तीन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपला अहवाल तहसीलदारांकडे देतील. त्यानंतर तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सदर अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयात सादर होऊन शासनाकडे पाठविला जाणार आहे.कापसाच्या चिंध्या उडाल्यायावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली नव्हती. कापूस शेतातच होता. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसाने झाडावरील कापसाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.