शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सर्वेक्षणासाठी कृषी पथक शेतशिवारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:19 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले. आदेशानुसार बुधवारपासून महसूल व कृषी विभागाचे पथक शेतशिवारात ...

ठळक मुद्देतोंडचा घास हिरावला : अवकाळी पाऊस व गारपीट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले. आदेशानुसार बुधवारपासून महसूल व कृषी विभागाचे पथक शेतशिवारात जाऊन पिकांचे सर्व्हेक्षण करीत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला होता. ढगाळ वातावरण कायम होते. अशातच सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही तालुक्यात गारपीटीसह पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अवकाळ पाऊस गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सिंदेवाही तालुक्यातील एका गावात, वरोरा तालुक्यात ३० गावामध्ये, भद्रावती तालुक्यात ४ गावांमध्ये तर राजुरा तालुक्यात ३ गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती आहे. गारपीटीमुळे धोपटाळा येथे एक गाय व वासरु मृत्यूमुखी पडले. मुधोली, वडाळा, आष्टा, मानोरा, मारडा, धिडसी, निरळी, चिकणी, माढेळी, टेंभुर्डा आदी गावांमध्ये गारपीट झाली. तर वीज कोसळून महालगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव या गावांसह ३० गावातील पीक उद्धवस्त झाली आहेत. रबी पिकांमध्ये हरभरा व गहू पिकाला सर्वाधिक फटका बसला असून गहू पीक पूर्णत: जमिनीवर झोपून गेले तर हरभऱ्याचे दाणे फुटून पडले आहेत. तर भाजीपाला व आंब्याचा बहारही जमीनदोस्त झाला आहे. शेतामध्ये उभ्या झाडांना कापूस दिसेनासे झाले आहे. बल्लापूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, कोठारी, काटवली (बामणी), इटोली, मानोरा, कवडजी, मोहाळी, कोर्टिमक्ता येथील शेतकºयांना मोठ्या फटका बसला आहे. यंदा वारंवार शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप होत आहे. खरिपात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पीक उद्ध्वस्त झाले होते.राजुरा तालुक्यात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्तगोवरी : सोमवार आणि मंगळवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने कापूस, गहू, हरभरा, ज्वारी ही पिके पुर्णत: भुईसपाट झाली आहे. राजुरा तालुक्याला वादळाचा चांगलाच फटका बसला असून शेतकरी पार कोलमडून पडला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतीचे गणित चुकले. उसनवारी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी कसीबशी शेती केली. मात्र यावर्षी बोंडअळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणले. शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला असतानाच दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने राजुरा तालुक्याला झोडपून काढले. पीक निघायला फक्त काही दिवसाचा अवधी असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मारडा, गोवरी, पोवनी, साखरी, पेल्लोरा, धिडशी, वरोडा, चार्ली, निर्ली, कढोली, बाबापूर, चिंचोली परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.तिघांचे पथकजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनीही आपल्या यंत्रणेला तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक आणि तांत्रिक म्हणून कृषी सहायक या तिघांचे पथक प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शिवारात जात आहे. येत्या तीन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपला अहवाल तहसीलदारांकडे देतील. त्यानंतर तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सदर अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयात सादर होऊन शासनाकडे पाठविला जाणार आहे.कापसाच्या चिंध्या उडाल्यायावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली नव्हती. कापूस शेतातच होता. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसाने झाडावरील कापसाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.