शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

शेती पाण्यात, शेतकरी संकटात पंचनाम्याची पथके गेली कुठे? कापूस, सोयाबीन व धान पिकांचे प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:05 IST

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी : पीक वाचविण्यासाठी सुरू आहे धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने कापूस, सोयाबीन व धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुधवारी (दि. २९) तर पावसाने कहर केला. शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली आले. धानाच्या बांधीतील पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पंचनामा करण्यासाठी प्रशासनाचे पथक शुक्रवारी (दि. ३१) नुकसानग्रस्त शिवारात पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सद्यःस्थितीत हलका व मध्यम कालावधीचा धान कापणीच्या टप्प्यात आला. लवकर रोवणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी तर हा धान कापून सुकविण्यासाठी बांधीत सरड्या ठेवल्या आहेत. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपूरी, नागभीड, गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाली. सावली तालुक्यातील व्याहाड बुज., वाघोलीबुट्टी, सामदा, सोनापूर, कापसी, उपरी, पेठगाव, भांसी, डोनाळा, कढोली, हरांबा, लोंढोली, साखरी, सिर्सी, जांब, केरोडा, व्याहाड खुर्द, मोखाडा शिवारात हलक्या धानाची कापणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु, या परिसरात मागील चार दिवस जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाले. शेतकरी संकटात सापडले आहेत. 

चिमूर तालुक्यातही प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती दिली. मात्र, शुक्रवारी (दि. ३१) एकही पथक नुकसानग्रस्त शिवारात पोहोचले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पंचनाम्यानंतर वाढणार नुकसानीचा आकडा

प्राथमिक अंदाजानुसार दीड हजार हेक्टर क्षेत्रावर शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात धान, कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांची संख्याही दीड हजारपेक्षा होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी तलाठी व ग्रामसेवकाला माहिती दिली. काही ठिकाणी तलाठ्यांनी शिवाराची पाहणी केली. मात्र, कृषी विभागाचे कर्मचारी तिथे उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे रितसर पंचनामा प्रक्रियेला सुरूवातच झाली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या जिल्हाभरात ढगाळ वातावरणाचे सावट आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढू शकतो.

चार तालुक्यांत सर्वाधिक नुकसान

पावसाने चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर बाधित झाले होते. याचा फटका ३ हजार ४१८ शेतकऱ्यांना बसला. वरोरा तालुक्यातही ५९२.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. याचा एक हजार ४०८ शेतकऱ्यांना तडाखा बसला होता. याशिवाय, नागभीड व सिंदेवाही तालुक्यातही प्रचंड नुकसान झाले. याची भरपाई अद्याप मिळाली नाही. आता पावसाने तोंडातला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला. मात्र, पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाली नाही.

शेतकऱ्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा

जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लक्ष १० हजार ६६५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा १ लक्ष २६ हजार २८६ शेतकऱ्यांना तडाखा बसला होता. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २४ हजार ९८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी ४३ लक्ष २८ हजार रुपये जमा केले आहे. उर्वरित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Crops; Farmers Await Aid, Survey Teams Absent

Web Summary : Chandrapur farmers face huge losses of cotton, soybean, and paddy due to incessant rains. Despite crop damage reports, survey teams are absent, delaying crucial compensation. Farmers await government assistance as losses mount.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरी