शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची

By admin | Updated: July 27, 2014 23:39 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या अनियमितपणामुळे खरिप पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची आहे.

जिवती : निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या अनियमितपणामुळे खरिप पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केली आहे.या योजनेत जोखिमेवर ६० टक्के असून विमा संरक्षित रक्कम कापूस २१ हजार २०० रुपये, सोयाबीन १७ हजार २०० रुपये, तूर १८ हजार ७०० रुपये तर ज्वारी ११ हजार ८०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. अल्पभूधारक (२ हेक्टरपर्यंत), अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत), शेतकऱ्यांना ९० टक्के तर इतर शेतकऱ्यांना (२ हेक्टरवरील), विमा हप्त्याची १०० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. विमा हप्ता बँकेत भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांनी विहित नमुना अर्ज, सातबारा, ८ अ व पेरणीचे प्रमाणपत्र जोडून रक्कम जमा करावी. जी बँक शेतकऱ्यांचे अर्ज व रक्कम घेण्यास टाळाटाळ करतील. शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत अशा बँक व्यवस्थापकाची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी करावी. महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद आणि कृषि विभागावर संयुक्त जबाबदारी देण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी संबधीत यंत्रणा प्रयत्नशील आहे.योजनेच्या व्यापक प्रचार व प्रसाराकरिता फ्लेक्स बॅनल, घडीपत्रिका, चावडी वाचन, ग्रामसभा ग्रामपंचायत संदेश बोर्डद्वारे माहिती देण्यात येत आहे. मंडळ कृषी अधिकारी प्रशांत मडावी हे समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या सोबत कृषी पर्यवेक्षक चव्हाण आणि बालाधरे वसर्व कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना अर्ज भरून देण्यास मदत करीत आहेत. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती व कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)