शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रंगणार सहकारी संस्थांची निवडणूक धुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे.  सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी करताच चंद्रपूर जिल्ह्यातही सहकारी क्षेत्रातील हालचालींना वेग आला. सुमारे २५० पेक्षा अधिक सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याने प्रारूप मतदार याद्या तयार१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे.  सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीसाठी १ एप्रिल ही अर्हता गृहीत धरून पात्र असलेल्यांची प्रारूप मतदार यादी तयार केली जात आहे. ज्या क्रमाने संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्याच अनुक्रमे या सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी, असे सहकार विभागाला निर्देश आहेत.

असा आहे जिल्हास्तरीय  निवडणूक आराखडा- जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार निवडणुकीचे टप्पे ठरविण्यात आले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, टप्प्यातील संस्था १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत निवडणुकीसाठी पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे

निवडणूक जाहीर झाल्याने चैतन्य   - कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना मरगळ आली. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने केवळ प्रशासकीय कारभार हाकला जात आहे. - नवीन योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच नाही. सहकारी संस्थांचा कारभार थंडबस्त्यात होता. - राज्य सरकारने मंगळवारी निवडणुकीची घोषणा केली. सहकार विभागही सक्रिय झाला. त्यामुळे सहकार क्षेत्रात सध्या चैतन्य निर्माण झाले आहे.- आदेश धडकल्याने सहकारी क्षेत्रातील विविध गट निवडणूकीसाठी सक्रीय झाले आहेत.

 

टॅग्स :Electionनिवडणूक