शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

सत्तेत आल्यानंतर भाजपला आश्वासनपूर्तीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:54 IST

मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात, सन २०१९ पर्यंत सर्वांना घरे यासह अनेक आश्वासनाची खैरात वाटली होती.

ठळक मुद्देनाना पटोले : भद्रावती येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात, सन २०१९ पर्यंत सर्वांना घरे यासह अनेक आश्वासनाची खैरात वाटली होती. परंतु, बहुमतातल्या या सरकारला सत्तेत चार वर्षे होवून सुद्धा दिलेली आश्वासने पूर्ण करता आले नाही. त्यामुळे भाजपची उलटी गंगा संपूर्ण देशात वाहत असल्याचा आरोप माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.येथील तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भद्रावती येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे, काँग्रेस नेते तथा कार्यक्रमाध्यक्ष डॉ.विजय देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे, जेष्ठ काँग्रेस नेते मनोहर पाटील ताजने, इंटक नेते धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, डॉ.बी.प्रेमचंद, वरोराचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, प्रेमदास आस्वले, माजी नगराध्यक्ष सरिता सूर, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष लिला नवले, नगरसेवक अल्का सातपुते, शेखर रंगारी, माजी पं.स. सभापती परशुराम जांभूळे, हरिश दुर्योधन, विलास खडके, शंकर बोरघरे, वैशिष्ठ लभाने, सतीश वानखेडे, पं.स. सदस्य चिंतामन आत्राम, सुधाकर आत्राम, भानुदास गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण बोढाले यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार तालुकाध्यक्ष भगतसिंग मालूसरे यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डावखोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला २०१९ च्या निवडणुकीत भारत मुक्त करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घराघरात जावून त्यांच्या खोटारडेपणाची माहिती द्यावी, असे आवाहन नाना पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. जीएसटी लादून भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेचा खिशात हात घातला आणि या सर्वसामान्य जनतेचा पैसा निरव मोदी आणि अन्य भांडवलदारांच्या घशात घातला. देशातील एक लाख जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा खेळ सरकारने चालविला आहे. यात गरीबांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस