शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : प्रवेश प्रक्रिया सुरु, १७४२ बालकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीई आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला शाळास्तरावर २४ जूनपासून सुरूवात झाली. १५ दिवसांत एक हजार ७४२ पैकी आतापर्यंत ४१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.आरटीई प्रवेशासाठी यंदा शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी केली आहे. त्यानुसार तात्पुरते प्रवेश दिले जात आहे. समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणीअंती प्रवेश निश्चित केले जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्क्े जागांवर प्रवेश देण्यात येतो.जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळास्तरावर प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. याबाबत शिक्षण विभागाकडून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासंदर्भात तारीख कळविली होती. त्यापैकी ४१३ बालकांचा प्रवेश झाल्याची आकडेवारी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.८७३ जणांना तात्पुरता प्रवेशअर्ज दाखल केलेल्या पात्र विद्यार्थ्यांपैकी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढलेल्या लॉटरीमध्ये सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी ८७३ जणांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. तर ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तात्पुरात प्रवेश झालेल्या बालकांना लवकर निश्चित प्रवेश घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षण