शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : प्रवेश प्रक्रिया सुरु, १७४२ बालकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीई आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला शाळास्तरावर २४ जूनपासून सुरूवात झाली. १५ दिवसांत एक हजार ७४२ पैकी आतापर्यंत ४१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.आरटीई प्रवेशासाठी यंदा शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी केली आहे. त्यानुसार तात्पुरते प्रवेश दिले जात आहे. समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणीअंती प्रवेश निश्चित केले जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्क्े जागांवर प्रवेश देण्यात येतो.जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळास्तरावर प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. याबाबत शिक्षण विभागाकडून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासंदर्भात तारीख कळविली होती. त्यापैकी ४१३ बालकांचा प्रवेश झाल्याची आकडेवारी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.८७३ जणांना तात्पुरता प्रवेशअर्ज दाखल केलेल्या पात्र विद्यार्थ्यांपैकी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढलेल्या लॉटरीमध्ये सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी ८७३ जणांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. तर ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तात्पुरात प्रवेश झालेल्या बालकांना लवकर निश्चित प्रवेश घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षण