शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासकीय धिंडवडे

By admin | Updated: May 13, 2014 23:22 IST

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते.

रवी जवळे - चंद्रपूर

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो. मात्र जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात या योजना फाईलीत गुंडाळून नागरिकांना आजारांच्या खाईत लोटण्याचे संतापजनक प्रकार होत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांना हद्दपार करणार्‍या फॉगींग मशीन्सबाबत जिल्हा परिषदेने हाच कित्ता गिरवला आहे. जिल्हाभर पुरविलेल्या २७७ फॉगींग मशीन्सपैकी तब्बल २३२ मशीन्स बंद असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाला साधा डास चावल्याची जाणीव होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. मुंबईच्या मंत्रालयातून येणार्‍या विविध विभागातील योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे युध्दस्तरीय काम होत असते. मात्र अलिकडे हे मिनी मंत्रालय डस्टबीनसारखेच काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आल्या योजना की गुंडाळल्या फाईलीत, असेच समीकरण सुरू आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे वृत्त जिल्ह्यातील अनेक गावांमधून येत आहे. मागील एक महिन्यात दहाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. काही जणांचे मृत्यू तापामुळे झाले असले तरी ते समोर येऊ शकले नाही. साथीचे आजार पसरल्याची तक्रार आली की जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग केवळ शिबिर लावून हात मोकळे करतात, असा अनुभव आहे.

डासांचा नाईनाट करणार्‍या फॉगींग मशीन्सचा पुरवठा शासनाने गावागावांमध्ये केला. केवळ मशीन्स पुरवून प्रशासन गप्प बसले. प्रत्यक्षात या मशीन्स धूळखात पडून आहे. जिल्हाभरात २७७ फॉगींग मशीन्स देण्यात आल्या आहेत. यात केवळ ४५ फागींग मशीन्स सुरू आहेत तर तब्बल २३२ मशीन्स दिल्यापासून बंद अवस्थेत आहे. मागील तीन वर्षांंपासून हीच स्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन स्वस्थ बसले आहे. नागरिकांचे स्वास्थ मात्र बिघडत आहे. केवळ कागदोपत्री या मशीन्स वाटून प्रशासन धन्यता मानत असली तरी दुसरीकडे डासांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यादेखत नागरिकांचे बळी जात आहे.

सद्यस्थितीत घुग्घुस, उर्जानगर, दुर्गापूर, नकोडा, ताडाळी, पडोली, नागाळा, आंबोरा, जुनोना, बोर्डा, पायली भटाळी, पद्मापूर, मोरवा, कोसारा, चिचपल्ली, बेंबाळ, डोंगरगाव, चिंचाळा, सावली, अंतरगाव, घोडेवाही, पाथरी, चिचबोडी, व्याहाड बु., चांदाबुज, गायडोंगरी, मोखाळा, निलसनी पेठगाव, सोनापूर, पळसगाव जाट, पेठगाव, देलनवाडी, लोणवाही, अंतरगाव, नवखळा, नांदेड, वाढोणा, परडी ठवरे, कोजबीमाल, गोविंदपूर, विहिरगाव, सावरगाव, आलेवाही, ढोरपा, तळोधी बा., मिंडाळा, मौशी, कन्हाळगाव, किटाळी बो., कान्पा, मिंथूर, चिंधीचक, बाळापूर, मेंडकी, गांगलवाडी, मुडझा, बरडकिन्ही, हळदा, अर्‍हेर नवरगाव, पिंपळगाव, चौगाण, जुगनाळा, खेडमक्ता, मालडोंगरी, उदापूर, तुलनमेंढा, बोरगाव, चिखलगाव, नान्होरी, खरकाडा, बेटाळा, रामपुरी, तळोधी, बेलगाव जाणी, रई, भुज, आवळगाव, घोडपेठ, चालबर्डी, घोनाड, चेक तिरवंजा, माजरी, नंदोरी, देऊळवाडा, कोंढा, पाटाळा, डोंगरगाव, धानोली, पिर्ली, विलोडा, चंदनखेडा, बेलगाव, वायगाव, सागरा, शेगाव खु., मुधोली, आष्टा, भामडेळी, शेगाव, माढेळी, नागरी, टेमुर्डा, सालोरी, आबामक्ता, वायगाव, बोर्डा, सुमठाणा, सोईट, पाचगाव, आनंदवन, चिकणी, वंधली, जळका, मोखाळा, खांबाडा, चरूरखटी, खेमजई, भटाळा, बोरगाव, डोंगरगाव, खरवडा यासह तब्बल २३२ गावांमध्ये फॉगींग मशीन्स बंद आहेत.