शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशासकांच्या हाती जि.प.चा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार आता प्रशासकांच्या हातात गेला आहे. दरम्यान, विविध बिल, कामे करून घेण्यासाठी मागील काही दिवसांत जिल्हा परिषद परिसरात पदाधिकारी, सदस्यांची सारखी वर्दळ बघायला मिळाली. विशेष म्हणजे निवडणूक होईपर्यंत, म्हणजे पुढील किमान सहा महिने प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेचा कारभार चालविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे ३३, तर काँग्रेस २० सदस्य निवडून आले होते. त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता होती. अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्या संध्या गुरुनुले विराजमान होत्या. निवडणुकीसाठी बराच कालावधी असल्यामुळे  इच्छुकांना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, गावागावात गाठीभेटीला मात्र वेग आला आहे.

सतत पाचवेळा निवडून येण्याचा पराक्रमजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले या मूल तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रातून सतत पाच वेळा निवडून आल्या आहेत. १९९९ मध्ये त्यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती सभापतिपद होते. त्यानंतर १४-१५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. दरम्यान, मागील अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे. दीर्घ अनुभवामुळे त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती.

२२ वर्षांनंतर ते झाले माजी

प्रथम सात वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर तीन पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेवर निवडून आलेले काँग्रेसचे डाॅ. सतीश वारजुकर हे तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारपासून माजी सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद