शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सफर; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:20 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील ८४ विद्यार्थ्यांचा सहभाग

वसंत खेडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़शहरातील प्रशस्त रस्ते, उद्यान, शोभीवंत इमारती, सोयीसुविधा आणि चकचकीतपणा बघून दीपून गेले. हे सारे दृश्य बघितल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात अशा सोईसुविधा कधी येणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला़ एटापल्ली तालुक्यातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न उमटले़ अतिदुर्गम भागातील १४ ते१८ वयाचे एकूण ८४ विद्यार्थी- विद्यार्थिनी  महाराष्ट्र दर्शनावर निघाले आहेत. मंगळवारी बल्लारपूरला दाखल झालेत़ बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना एका विद्यार्थिनीने विचार करायला लावणारा हा प्रश्न उपस्थितांसमोर मांडला़ अन्य विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शहराविषयीचे कुतूहल जागृत केले़  महाराष्ट्र दर्शन आमच्याक़रिता अगदी नवीन आणि मनात आत्मविश्वास जागविणारा आहे़ नवे जग प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभव घेण्याचा आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले़ त्यातील बहुतेक विद्यार्थी स्वत:चे गाव सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांच्यात काहीसा बुजरेपणाही दिसून येत होता. मात्र, या सफरीने ते आनंदीत झाले होते़ एका विद्यार्थ्यांने आपले अनुभव इंग्रजीतून कथन केले. पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले़ गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची ही सफर महाराष्ट्र दर्शनासाठी निघाली आहेत़ विद्यार्थ्यांसोबत गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अनिल तांदोळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख आदी सहभागी झाले आहेत. पोलीस आणि आदिवासी विकास विभागाकडून या सहलीचे आयोजन करण्यात आले़ विद्यार्थ्यांनी पुस्तकातून जे वाचले ते त्यांनी प्रत्यक्ष बघावे़ मुख्य प्रवाहात मिसळावे, हा या सहलीचा मुख्य उद्देश असल्याचे तांदोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांची ही सफर २१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र भ्रमण करणार आहे. चंद्रपूर, ताडोबा, शेगाव, नागपूर, आणि पेंच प्रकल्पालाही भेट देणार आहेत़ ही १७ वी सफर असून आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र दर्शन सहलीत सहभागी झाले आहेत़

विद्यार्थ्यांचे बल्लारपुरात स्वागतया सफरीत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी दिसलेत. बल्लारपुरातील पोलीस ठाण्यात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले़ यावेळी ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता़ आदिवासी बोलीतील गीत सुरू करताच विद्यार्थ्यांनी तालसुरात आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली़

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस