शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शेळीगट वाटपातील शेळयांचा पत्ता गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा ...

मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा शेळया व एक बोकड लाभार्थ्यांना आणून देण्यात आले होते. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळयांचे वाटपही करण्यात आले. मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी शेळया विकल्याचे समोर आले आहे. सदर लाभार्थ्यामध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह काही शासकीय कर्मचाºयांच्या पत्नीचाही समावेश आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनी दिले होते. मात्र त्या प्रकरणाची चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजागर देण्याच्या दृष्टीने चांदा ते बांदा विकास योजनेंतर्गत १० शेळया आणि एक बोकड असा शेळी गट वाटप करण्याची योजना आहे. या योजनेतील खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना ९० टक्क्यापर्यंत शासनाकडून अनुदान दिल्या जाते. मूल तालुक्यातील गडीसुर्ला, जुनासुर्ला, बेलघाटा, मुरमाडी, चिरोली, भगवानपूर आणि जानाळा या सात गावातील सुमारे ७८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळी आणि बोकड वाटपही करण्यात आलेले आहे. त्या शेळयांचा तीन वर्षांचा विमासुध्दा काढण्यात आलेला आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या दिशादर्शक नियमानुसार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ न देता सरळसरळ लाभ देण्यात आलेला आहे. अनेक लाभार्थ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व चारा उत्पादन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक होते. परंतु यातील अनेक लाभार्थी अप्रशिक्षीत आहेत. यामुळे शेळयांचे संगोपन कशा पध्दतीने करतील, याचा थोडाही विचार वाटप करणाºया अधिकाºयांनी केलेला नाही.

सदर योजनेचा लाभ घेणाºया लाभार्थ्याकडून किमान तीन वर्षे शेळयांचे संगोपन करण्याबाबत बंधपत्र लिहून घेणे आवश्यक होते. मात्र तसे केले नाही.आता या योजनेतील शेळया अनेकांनी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र सध्या ती थंडबस्त्यात आहे.

बॉक्स

मूल तालुक्यात ८४७ शेळ्यांचे वाटप

तालुक्यात ७८ लाभार्थ्यांना ८४७ शेळया आणि बोकड वाटप करण्यात आलेले आहे. सदर शेळया व बोकड हे अमरावती, जोळमोहा यवतमाळ, लाखांदूर येथून आणण्यात आलेले असून यातील ३५ शेळयांचा विविध आजारेने मृत्यू झाला आहे. परंतु उर्वरित शेळया गेल्या कुठे, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.