शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शेळीगट वाटपातील शेळयांचा पत्ता गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा ...

मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा शेळया व एक बोकड लाभार्थ्यांना आणून देण्यात आले होते. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळयांचे वाटपही करण्यात आले. मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी शेळया विकल्याचे समोर आले आहे. सदर लाभार्थ्यामध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह काही शासकीय कर्मचाºयांच्या पत्नीचाही समावेश आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनी दिले होते. मात्र त्या प्रकरणाची चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजागर देण्याच्या दृष्टीने चांदा ते बांदा विकास योजनेंतर्गत १० शेळया आणि एक बोकड असा शेळी गट वाटप करण्याची योजना आहे. या योजनेतील खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना ९० टक्क्यापर्यंत शासनाकडून अनुदान दिल्या जाते. मूल तालुक्यातील गडीसुर्ला, जुनासुर्ला, बेलघाटा, मुरमाडी, चिरोली, भगवानपूर आणि जानाळा या सात गावातील सुमारे ७८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळी आणि बोकड वाटपही करण्यात आलेले आहे. त्या शेळयांचा तीन वर्षांचा विमासुध्दा काढण्यात आलेला आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या दिशादर्शक नियमानुसार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ न देता सरळसरळ लाभ देण्यात आलेला आहे. अनेक लाभार्थ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व चारा उत्पादन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक होते. परंतु यातील अनेक लाभार्थी अप्रशिक्षीत आहेत. यामुळे शेळयांचे संगोपन कशा पध्दतीने करतील, याचा थोडाही विचार वाटप करणाºया अधिकाºयांनी केलेला नाही.

सदर योजनेचा लाभ घेणाºया लाभार्थ्याकडून किमान तीन वर्षे शेळयांचे संगोपन करण्याबाबत बंधपत्र लिहून घेणे आवश्यक होते. मात्र तसे केले नाही.आता या योजनेतील शेळया अनेकांनी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र सध्या ती थंडबस्त्यात आहे.

बॉक्स

मूल तालुक्यात ८४७ शेळ्यांचे वाटप

तालुक्यात ७८ लाभार्थ्यांना ८४७ शेळया आणि बोकड वाटप करण्यात आलेले आहे. सदर शेळया व बोकड हे अमरावती, जोळमोहा यवतमाळ, लाखांदूर येथून आणण्यात आलेले असून यातील ३५ शेळयांचा विविध आजारेने मृत्यू झाला आहे. परंतु उर्वरित शेळया गेल्या कुठे, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.