शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जिल्ह्याच्या नव्या यादीत ब्रह्मपुरीचा समावेश करा

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ब्रह्मपुरी : ८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सन १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली. त्यावेळी गडचिरोली की ब्रह्मपुरीला जिल्ह्याचा दर्जा द्यायचा, यावरून बरेच वादळ उठले होते. गडचिरोली जिल्ह्याचे नाव घोषित होण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. शेवटी राजकारणात ब्रह्मपुरीचे नाव मागे पडून गडचिरोलीचे नाव जिल्ह्यासाठी घोषित झाले. परंतु ब्रह्मपुरीकरांनी जिल्ह्याची आशा अद्यापही सोडली नाही. नविन जिल्ह्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या की, ब्रह्मपुरीकरांनी आंदोलने करून निवेदन दिले आहे. परंतु अनेकदा या मागणीला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ज्या तालुक्यांची नावे जिल्ह्यासाठी समोर आली आहेत, त्या तालुक्याला तशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. केवळ राजकीय हितासाठी त्या तालुक्याचे नाव संभाव्य जिल्ह्याच्या यादीत टाकण्यात आले असल्याचा आरोप ब्रह्मपुरीवासियांकडून केला जात आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी कशी अनुकूल आहे. हे शासनस्तरावर वेळोवेळी पटवून देण्यात आले आहे. तरीही जिल्ह्याच्या यादीत नाव न आल्याने ब्रह्मपुरीवर हा अन्याय आहे. ब्रह्मपुरीला सर्वच उपविवभाग आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक वैभव प्राप्त हे शहर आहे. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी संंभाव्य इमारती उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त नवीन इमारतीसाठी महसूल व वनविभागाची अनेक हेक्टर जागा याचे जाळे चारही बाजूने पसरलेले आहे. फक्त या तालुक्याला राजकीय वारसा नसल्याने ब्रह्मपुरी नेहमी जिल्ह्यासाठी मागे पडत आहे. हा जाणिवपूर्णक करण्यात आलेला अन्याय आहे.. शासनाने जिल्ह्याचे निकष काय आहेत हे प्रसिद्ध करावे जेणेकरून ते निकषही पूर्ण करता येईल असाही राजकीय सुर उमटत आहे. ब्रह्मपुरीवर १९८२ पासून जिल्ह्याच्या बाबतीत अन्याय होतो तो अन्याय जिल्ह्या यादीत टाकून दूर करावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. (प्रतिनिधी)