शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

जिल्ह्याच्या नव्या यादीत ब्रह्मपुरीचा समावेश करा

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ब्रह्मपुरी : ८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सन १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली. त्यावेळी गडचिरोली की ब्रह्मपुरीला जिल्ह्याचा दर्जा द्यायचा, यावरून बरेच वादळ उठले होते. गडचिरोली जिल्ह्याचे नाव घोषित होण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. शेवटी राजकारणात ब्रह्मपुरीचे नाव मागे पडून गडचिरोलीचे नाव जिल्ह्यासाठी घोषित झाले. परंतु ब्रह्मपुरीकरांनी जिल्ह्याची आशा अद्यापही सोडली नाही. नविन जिल्ह्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या की, ब्रह्मपुरीकरांनी आंदोलने करून निवेदन दिले आहे. परंतु अनेकदा या मागणीला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ज्या तालुक्यांची नावे जिल्ह्यासाठी समोर आली आहेत, त्या तालुक्याला तशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. केवळ राजकीय हितासाठी त्या तालुक्याचे नाव संभाव्य जिल्ह्याच्या यादीत टाकण्यात आले असल्याचा आरोप ब्रह्मपुरीवासियांकडून केला जात आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी कशी अनुकूल आहे. हे शासनस्तरावर वेळोवेळी पटवून देण्यात आले आहे. तरीही जिल्ह्याच्या यादीत नाव न आल्याने ब्रह्मपुरीवर हा अन्याय आहे. ब्रह्मपुरीला सर्वच उपविवभाग आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक वैभव प्राप्त हे शहर आहे. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी संंभाव्य इमारती उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त नवीन इमारतीसाठी महसूल व वनविभागाची अनेक हेक्टर जागा याचे जाळे चारही बाजूने पसरलेले आहे. फक्त या तालुक्याला राजकीय वारसा नसल्याने ब्रह्मपुरी नेहमी जिल्ह्यासाठी मागे पडत आहे. हा जाणिवपूर्णक करण्यात आलेला अन्याय आहे.. शासनाने जिल्ह्याचे निकष काय आहेत हे प्रसिद्ध करावे जेणेकरून ते निकषही पूर्ण करता येईल असाही राजकीय सुर उमटत आहे. ब्रह्मपुरीवर १९८२ पासून जिल्ह्याच्या बाबतीत अन्याय होतो तो अन्याय जिल्ह्या यादीत टाकून दूर करावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. (प्रतिनिधी)