शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

शेतकऱ्यांची फसवणूक करणारी टोळी सक्रीय

By admin | Updated: May 22, 2016 00:34 IST

तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे.

कर्जाच्या नावाखाली केली जाते शेतीची विक्री दोन वर्षांत १५ गुन्हे दाखल : आशिष घुमे  वरोरातालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे. कमी वेळात संपत्ती मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणून काही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी अनेक शेतकऱ्यांची शेती गिळकृंत करीत असल्याच्या पोलिसात तक्रारी आहेत.वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये १७ प्रकरणे उघडकीस आले आहेत. कुठल्या न कुठल्या मार्गाने शेतकरी त्यांच्या जाळ्यात फसत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी तर कुटुंबातील सदस्याच्या आजारामुळे बेजार झालेला शेतकरी राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडे जातो व शेती गहाण करण्याच्या नावाखाली तात्पुरती विक्री म्हणून शेतीची विक्री करुन देतो. तसेच एखाद्या शेतकऱ्याला एक लाख रुपयांची गरज असल्यास विक्री पत्रावर शासनाच्या दरानुसार विक्री करावी लागते. म्हणून शासनदरानुसार किंमत मिळाली असे लिहून घेतल्या जाते. मध्यस्थी करणाऱ्या दलालाची सही साक्षिदार म्हणून घेतली जाते. जेव्हा संबंधित शेतकरी घेतलेले पैसे परत करायला जातो, तेव्हा लिहून दिलेली रक्कम अगोदर परत कर, असे सांगून त्याला परत पाठविल्या गेल्याचे अनेक प्रकार घडलेले आहे. वाममार्गाने शेकडो एकर शेतजमीन स्वत:च्या व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने केल्याचीही चर्चा शहरात आहे. ५० हजारांचाही व्यवहार करण्यासाठी आता शासनाने पॅन कार्डची सक्ती केली असताना करोडो रुपयांची जमविलेली माया आयकर विभागाला दिसत नाही का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करु लागले आहेत.एकीकडे पिडीत शेतकरी न्याय मागायला ठाण्याचे उंबरठे झिजवित आहेत, तर दुसरीकडे या भामट्यांना पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांकडून व्हीआयपी सेवा दिली जात आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी झाल्यास आयकर विभाग, पोलीस विभाग, दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.मोठे मासे जाळ्या बाहेरवरोरा तालुक्यात ठिकठिकाणी जमिन,प्लॉट कर्जाच्या नावाखाली स्वत:च्या नावाने करून घेणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्या तरी अद्याप यातील मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली जातात. शेतकऱ्याच्या अज्ञाानाचा फायदा घेत शेत गहाण ठेवण्याच्या नावाखाली शेतीची मूळ विक्री करून त्या शेतीवर हक्क सांगितला जातो. त्यानंतर धमक्या देऊन प्रसंगी पोलिसांची भिती दाखवून गरीब शेतकऱ्याला दमदाटी, करण्याच्या घटनाही परिसरात घडत आहेत. मूळ मालक चुकून पोलिसात तक्रार करायला गेला तर खासगी मामला असल्याचे सांगून सरळ न्यायालयाचा रस्ता दाखविण्यात येत आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहतात. एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या अशाच एका प्रकरणाची शहरात चर्चा आहे.