शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पाणी गुणवत्तेच्या कामात दिरंगाई झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:26 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, ...

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण बैठक : सीईओंचा अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, असा गंभीर इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.जिल्हा परिषदेच्या जनपथ सभागृहात सर्व पंचायत समीत्यांचे आरोग्य विस्तार अधिकारी यांची त्यांनी बैठक बोलाविली होती. यावेळी ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, कनिष्ठ प्रशासनिक अधिकारी कल्पना सूर्यवंशी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय धोटे, पाणी गुणवत्ता सल्लागार अंजली डाहुले, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ प्रवीण खंडारे, नरेंद्र रामटेके उपस्थित होते.पापळकर पुढे म्हणाले, पाणी गुणवत्ता विषयाबाबत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाºयांनी कामामध्ये कसूर करता कामा नये. शासनाने जी ही मोठी यंत्रणा उभी केली आहे, तिचा उपयोग गावाच्या विकासासाठी केला पाहिजे.गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता प्रयत्नरत राहिले पाहिजे. अधिकाऱ्यांनी गावामध्ये जावून वेळोवेळी ग्रामस्थांना स्वच्छता व पाणी गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन करुन त्या गोष्टी त्यांना करायला लावाव्यात. गावातील पाण्याचे स्त्रोत जिथे असतात, त्या स्त्रोताजवळ घाण असेल तर ग्रामस्थांना त्याबाबत मार्गदर्शन करुन पाणी गुणवत्तेबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही पापळकर यांनी केल्या. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी विजय पचारे ग्रामीण भागातील पाणीस्रोत दूषित होऊ नये, याकरिता काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले.खताच्या खड्ड्यांचा लिलाव करागावामध्ये अनेक ठिकाणी खताचे खड्डे असतात. ते गावातील लोकांना त्वरित काढण्यास सांगावे. जर ऐकत नसतील तर ग्रामपंचायतीने त्याचा लिलाव करुन टाकावा. गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये किंवा साथीचे आजार पसरु नये, याकरिता जिल्हा परिषद यंत्रणांनी विस्तार अधिकारी (आरोग्य), ग्रामीण पाणी पूरवठा उपविभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा सल्लागार, बीआरसी, आरोग्यसेवक, जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याचे स्रोत चांगले राहतील, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जितेंद्र पापळकर म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी