शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गुणवत्तेच्या कामात दिरंगाई झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:26 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, ...

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण बैठक : सीईओंचा अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, असा गंभीर इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.जिल्हा परिषदेच्या जनपथ सभागृहात सर्व पंचायत समीत्यांचे आरोग्य विस्तार अधिकारी यांची त्यांनी बैठक बोलाविली होती. यावेळी ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, कनिष्ठ प्रशासनिक अधिकारी कल्पना सूर्यवंशी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय धोटे, पाणी गुणवत्ता सल्लागार अंजली डाहुले, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ प्रवीण खंडारे, नरेंद्र रामटेके उपस्थित होते.पापळकर पुढे म्हणाले, पाणी गुणवत्ता विषयाबाबत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाºयांनी कामामध्ये कसूर करता कामा नये. शासनाने जी ही मोठी यंत्रणा उभी केली आहे, तिचा उपयोग गावाच्या विकासासाठी केला पाहिजे.गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता प्रयत्नरत राहिले पाहिजे. अधिकाऱ्यांनी गावामध्ये जावून वेळोवेळी ग्रामस्थांना स्वच्छता व पाणी गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन करुन त्या गोष्टी त्यांना करायला लावाव्यात. गावातील पाण्याचे स्त्रोत जिथे असतात, त्या स्त्रोताजवळ घाण असेल तर ग्रामस्थांना त्याबाबत मार्गदर्शन करुन पाणी गुणवत्तेबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही पापळकर यांनी केल्या. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी विजय पचारे ग्रामीण भागातील पाणीस्रोत दूषित होऊ नये, याकरिता काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले.खताच्या खड्ड्यांचा लिलाव करागावामध्ये अनेक ठिकाणी खताचे खड्डे असतात. ते गावातील लोकांना त्वरित काढण्यास सांगावे. जर ऐकत नसतील तर ग्रामपंचायतीने त्याचा लिलाव करुन टाकावा. गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये किंवा साथीचे आजार पसरु नये, याकरिता जिल्हा परिषद यंत्रणांनी विस्तार अधिकारी (आरोग्य), ग्रामीण पाणी पूरवठा उपविभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा सल्लागार, बीआरसी, आरोग्यसेवक, जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याचे स्रोत चांगले राहतील, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जितेंद्र पापळकर म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी