शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्दे९२ हजारांचा दंड वसूल : नव्या वाहतूक निरीक्षकाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे. मागील दोन दिवसांत त्यांनी ३२१ वाहनचालकांवर विविध नियमांनुसार कारवाई करीत ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.पर्यावरण विभागाचे सचिवाच्या आदेशानुसार तत्कालीन वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व महेश कोंडावार यांनी मोठ्या जोमात कारवाई सुरु केली होती. मात्र अल्पावधितच त्यांची मोहीम थंडावली. त्यातच त्यांची बदली झाल्याने जयवंत चव्हाण यांनी वाहतूक निरिक्षक पदाचा पदभार स्विकारुन पुन्हा कारवाई सुरु केली. शुक्रवारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातील पथकांनी विना हेल्मेट वाहन चालविणाºया ८६, ओव्हर लोड वाहतूक दोन, नो पार्किग १२, बिवा सीट बेल्ट १९, राग साईड नऊ, ट्रिपल सीट एक, सिंगल जंम्पींग एक, ओव्हर सिट तीन, फॅन्सी नंबर प्लेट दोन, विना वाहन परवाना ३६, विना कागदपत्राअभावी वाहन चालविणे ११ अशा विविध नियमानुसार १८८ वाहनधारकांन्वर कारवाई करण्यात आली. यावेळी ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर शनिवारी १३३ वाहनचालकांवर कारवाई करीत २८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.वाहनचालकांना समुपदेशनशहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लघन करतात. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक निरिक्षक चव्हाण यांनी वाहनधारकांच्या पालकांना बोलाऊन त्यांच्यासमक्ष वाहनधारकांना समुपदेशन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालण करीत वाहन चालविण्याचा संदेश दिला.वाहनचालकांवर कारवाई करुन दंड आकारला तरीसुद्धा ते वाहतूक नियमांचे उल्लघन करताना मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्यांना वाहतूक नियमांचे उल्लघन केल्याने होणाºया दुष्परिणामाची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलासमोर समुदेशनातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालण करण्याचा सल्ला दिला..- जयवंत चव्हाण,वाहतूक निरिक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस