शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्दे९२ हजारांचा दंड वसूल : नव्या वाहतूक निरीक्षकाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे. मागील दोन दिवसांत त्यांनी ३२१ वाहनचालकांवर विविध नियमांनुसार कारवाई करीत ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.पर्यावरण विभागाचे सचिवाच्या आदेशानुसार तत्कालीन वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व महेश कोंडावार यांनी मोठ्या जोमात कारवाई सुरु केली होती. मात्र अल्पावधितच त्यांची मोहीम थंडावली. त्यातच त्यांची बदली झाल्याने जयवंत चव्हाण यांनी वाहतूक निरिक्षक पदाचा पदभार स्विकारुन पुन्हा कारवाई सुरु केली. शुक्रवारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातील पथकांनी विना हेल्मेट वाहन चालविणाºया ८६, ओव्हर लोड वाहतूक दोन, नो पार्किग १२, बिवा सीट बेल्ट १९, राग साईड नऊ, ट्रिपल सीट एक, सिंगल जंम्पींग एक, ओव्हर सिट तीन, फॅन्सी नंबर प्लेट दोन, विना वाहन परवाना ३६, विना कागदपत्राअभावी वाहन चालविणे ११ अशा विविध नियमानुसार १८८ वाहनधारकांन्वर कारवाई करण्यात आली. यावेळी ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर शनिवारी १३३ वाहनचालकांवर कारवाई करीत २८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.वाहनचालकांना समुपदेशनशहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लघन करतात. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक निरिक्षक चव्हाण यांनी वाहनधारकांच्या पालकांना बोलाऊन त्यांच्यासमक्ष वाहनधारकांना समुपदेशन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालण करीत वाहन चालविण्याचा संदेश दिला.वाहनचालकांवर कारवाई करुन दंड आकारला तरीसुद्धा ते वाहतूक नियमांचे उल्लघन करताना मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्यांना वाहतूक नियमांचे उल्लघन केल्याने होणाºया दुष्परिणामाची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलासमोर समुदेशनातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालण करण्याचा सल्ला दिला..- जयवंत चव्हाण,वाहतूक निरिक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस