शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:07 IST

खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.

ठळक मुद्देमिशन शक्तीचा थाटात शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिशन शक्तीमुळे तरुणांना संधी मिळाली आहे. खरे म्हणजे माझे अभ्यासात मन लागत नव्हते, क्रीडा क्षेत्राची मला आवड होती. खेळातून सांघिक भूमिका बजावता येते. खेळण्याची जिद्द, हारल्याचे आत्मपरिक्षण करण्याची प्रेरणा क्रीडा प्रकारातून मिळते. शालेय अभ्यासक्रमात विषयानुसार शिक्षणासोबत कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याची गरज आहे. खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विसापूर येथील १५ एकर जागेच्या परिसरात अद्यावत बल्लारपूर तालुका क्रीडासंकुल उभारण्यात आले. त्याचे व माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने कलावंत व दिग्दर्शक आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी आमिर खान बोलत होते.यावेळी व्यासपिठावर राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार नाना श्यामकुळे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष हरिश शर्मा, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.वाघाच्या जिल्ह्यातील युवकांना ऑलिम्पिक पदकाची संधी- सुधीर मुनगंटीवारजिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यातील युवकांना २०२४ ऑलिम्पिक खेळात भाग घेऊन पदक मिळविण्याची संधी मिशन शक्तीच्या माध्यामातून मिळणार आहे. लगतच्या गडचिरोली जिल्हादेखील यात सहभागी होणार आहे. मिशन शौर्यच्या माध्यमाने या भागातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन नावलौकीक मिळवला. आता मिशन शक्तीच्या रुपाने आलिम्पिक पदाला गवसणी घालण्याचे तरुणांना बळ दिले जाणार असल्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे रविवारी केले.आमीर खान यांचा पिंड देशभक्तीचा व सामाजिक बांधिलकी जोपासणारा आहे. त्यांनी भूमिका साकारलेल्या व दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून ते प्रतिबिंबीत होते. ‘लगान’ चित्रपट त्याचे चांगले उदाहरण आहे. कार्तिकेय गुप्ता याने जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत देशात अव्वल येवून राज्याचा लौकीक वाढविला. युपीएससीसह तत्सम स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करुन प्रशासकीय व्यवस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून येथील तरुणाला संधी मिळावी. सैनिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदावर जावा. जिल्ह्याचा नावलौकीक वाढावा. मिशन शौर्य, मिशन शक्तीप्रमाणेच प्रशासकीय सेवा कार्याचेही प्रतिबंब उमटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.तालुका क्रीडा संकुलात या आहेत सुविधाबल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामावर ३९८५.६० लक्ष रुपये खर्च करण्यात येवून अद्यावत क्रीडा संकूल उभारण्यात आले. यामध्ये दोन लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, बॉस्केट बॉल मैदान, व्हॉलीबॉल मैदान, ४०० मीटर सिंथेटिक स्मॉर्ट धावपट्टी, जलतरण तलाव, धनुर्विद्या क्षेत्रासह ५० मुलांची राहण्याची व्यवस्था असणारे वसतिगृह, संरक्षण भिंत, बॅडमिंटन हाल, पव्हेलियन इमारत, अंतर्गत रस्ते व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा प्रेरणा देणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार