शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळी, धुळवडीच्या आनंदाला नागरिक पारखे झाले होते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याची साऱ्यांचीच धडपड दिसून आली. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने वेग पकडला. तो कालावधीही होळीच्या आसपासचा होता. अनेक व्यवहार ठप्प होते. यंदा कोरोना ओसरल्याने रंगांची बेधुंद उधळण होणार आहे. रंग, पिचकारी व मुखवटे खरेदीसाठी लहान- मोठ्यांनी चंद्रपुरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले. गतवर्षी कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने  होळी गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालती होती. सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

गांधी चौकात  दुकाने गजबजलीचंद्रपुरातील गांधी चौक व विविध मार्गावर यंदा रंग, पिचकारी, गुलाल व अन्य वस्तू विकणाऱ्या हंगामी दुकानांची संख्या वाढली. गांधी चौकातही अनेक दुकाने लागली आहेत. कोरोनापासून थोडी मुक्ती मिळाल्याने यंदाच्या होळीसाठी लहान मुले आणि मोठ्यांमध्येही  उत्साह दिसून येत आहे. रात्री ८ वाजतापर्यंत दुकानामध्ये गर्दी दिसून आली.

रासायनिक रंग अपायकारकबाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व मुखवटे विक्रीसाठी आले. धूलिवंदनामध्ये रंग खेळण्यात व उधळण्यात मोठी मजा येते. मात्र, रंग वापरताना ते रासायनिक राहणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे दुर्लक्ष केल्यास हे रंग आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

सुरक्षेसाठी पोलिसांचा अलर्टहोळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने अलर्ट जारी केला आहे. होळी आणि रंगपंचमी हे भारतीय संस्कृतीतील विशेष सण असल्याने त्यांचे महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंग उडविण्याच्या कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले. तालुका व जिल्हास्थळी पोलीस तैनात करण्यात आले.

 

टॅग्स :Holiहोळी 2022