शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळी, धुळवडीच्या आनंदाला नागरिक पारखे झाले होते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याची साऱ्यांचीच धडपड दिसून आली. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने वेग पकडला. तो कालावधीही होळीच्या आसपासचा होता. अनेक व्यवहार ठप्प होते. यंदा कोरोना ओसरल्याने रंगांची बेधुंद उधळण होणार आहे. रंग, पिचकारी व मुखवटे खरेदीसाठी लहान- मोठ्यांनी चंद्रपुरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले. गतवर्षी कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने  होळी गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालती होती. सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

गांधी चौकात  दुकाने गजबजलीचंद्रपुरातील गांधी चौक व विविध मार्गावर यंदा रंग, पिचकारी, गुलाल व अन्य वस्तू विकणाऱ्या हंगामी दुकानांची संख्या वाढली. गांधी चौकातही अनेक दुकाने लागली आहेत. कोरोनापासून थोडी मुक्ती मिळाल्याने यंदाच्या होळीसाठी लहान मुले आणि मोठ्यांमध्येही  उत्साह दिसून येत आहे. रात्री ८ वाजतापर्यंत दुकानामध्ये गर्दी दिसून आली.

रासायनिक रंग अपायकारकबाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व मुखवटे विक्रीसाठी आले. धूलिवंदनामध्ये रंग खेळण्यात व उधळण्यात मोठी मजा येते. मात्र, रंग वापरताना ते रासायनिक राहणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे दुर्लक्ष केल्यास हे रंग आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

सुरक्षेसाठी पोलिसांचा अलर्टहोळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने अलर्ट जारी केला आहे. होळी आणि रंगपंचमी हे भारतीय संस्कृतीतील विशेष सण असल्याने त्यांचे महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंग उडविण्याच्या कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले. तालुका व जिल्हास्थळी पोलीस तैनात करण्यात आले.

 

टॅग्स :Holiहोळी 2022