शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ठरलाय नवा 'पॅटर्न' ; दुसऱ्या शाळेचे राहतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:14 IST

Chandrapur : ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असतील.

येत्या ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू होईल व १८ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत चालणार आहे. शहरातील परीक्षा केंद्रावर ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील ग्रामीणमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहे. शिक्षकांना केंद्रावर जाण्यासाठी वेळ लागणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी हा पॅटर्न राबवला जाणार आहे. 

आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकच बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन होईल, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 

सीसीटीव्हीही बसविले नाही मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला. एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रावरील बहुतांश पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला आळा बसविण्यात काही अंशी अपयश आले. शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले. पण, अजूनही बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा ते नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे. 

"फक्त केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालक यांची अदलाबदल करण्यात यावी. पर्यवेक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मूळ शाळेतच ठेवावे."- दिलीप मॅकलवार, जिल्हा कार्यवाह, मराशिप जिल्हा चंद्रपूर.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर