शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ठरलाय नवा 'पॅटर्न' ; दुसऱ्या शाळेचे राहतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:14 IST

Chandrapur : ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असतील.

येत्या ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू होईल व १८ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत चालणार आहे. शहरातील परीक्षा केंद्रावर ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील ग्रामीणमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहे. शिक्षकांना केंद्रावर जाण्यासाठी वेळ लागणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी हा पॅटर्न राबवला जाणार आहे. 

आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकच बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन होईल, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 

सीसीटीव्हीही बसविले नाही मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला. एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रावरील बहुतांश पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला आळा बसविण्यात काही अंशी अपयश आले. शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले. पण, अजूनही बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा ते नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे. 

"फक्त केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालक यांची अदलाबदल करण्यात यावी. पर्यवेक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मूळ शाळेतच ठेवावे."- दिलीप मॅकलवार, जिल्हा कार्यवाह, मराशिप जिल्हा चंद्रपूर.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर