शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

तीन तास शस्त्रक्रिया करून काढला पाच किलोचा गोळा

By परिमल डोहणे | Updated: May 4, 2024 17:08 IST

Chandrapur : चंद्रपुरातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया

चंद्रपूर : अंडाशयाला लागून असलेल्या गोळ्यामुळे पोटदुखीने त्रस्त असलेल्या महिलेवर चंद्रपुरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांनी तब्बल तीन तास अत्यंत गुंतागुंतीची असलेली यशस्वी शस्त्रक्रिया करून जवळपास सहा किलोचा गोळा २७ एप्रिल रोजी बाहेर काढला. त्यामुळे त्या महिलेची पोटदुखीपासून मुक्ती झाली आहे. आता त्या महिलेची रुग्णालयातून सुटी झाली असून, तिची प्रकृती सुव्यवस्थित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एका ४९ वर्षीय महिलेच्या पोटात साधारणत: एक वर्षभरापासून दुखत होते. सुरुवातीला त्या महिलेने साधे दुखणे असल्याचे समजून त्याकडे कानाडोळा केला. मात्र, दुखणे अधिकच वाढत गेल्याने त्यांनी भद्रावतीतील रुग्णालयात दाखवून उपचार केला. तरीही दुखणे सुरूच होते. मात्र, काही कालावधीनंतर त्यांच्या पोटाचा आकारही वाढू लागला होता. त्यामुळे २६ एप्रिल रोजी त्यांनी चंद्रपुरातील नायडू हॉस्पिटल गाठून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांना दाखवले. त्यांनी तपासणी करताच पोटात गोळा असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या महिलेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर अंडाशयाला लागून गोळा असल्याचे निदान झाले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांनी त्या महिलेला शस्त्रक्रिया करून तो गाळे काढावा लागतो, असे सांगून शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. दरम्यान, २७ एप्रिल रोजी त्या महिलेवर डॉ. नगिना नायडू यांनी आपल्या सहकार्यासह तिच्यावर सुमारे तीन तास अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करून तो गोळा काढला. ॲनेस्थेलॉजिस्ट डॉ. प्रवीण डोंगरे यांनी सहकार्य केले. १ मे रोजी त्या महिलेला संपूर्ण उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता त्या महिलेची प्रकृती सुव्यवस्थित आहे.

त्या महिलेच्या अंडाशयाला लागून गोळा असल्याचे निदान सोनोग्राफीतून झाले होते. त्यात सुमारे पाच लिटर पाणी होते. त्यामुळे तो गोळा काढणे गरजेचे होते. याबाबत त्या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास तीन तास शस्त्रक्रिया करून तो गोळा बाहेर काढण्यात आला. त्या महिलेची प्रकृती योग्य असून, १ मे रोजी तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.-डॉ. नगिना नायडू, स्त्रीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

गोळ्यात तयार झाले होते पाणी

एक वर्षभरापासून त्या महिलेला हा त्रास होता. मात्र त्याचे योग्य निदान होत नसल्याने तो गोळा वाढत जात होता. जसजसा गोळा वाढत जात होता, तसतसे पोटही फुगत होते. डॉ. नगिना नायडू यांनी तपासणी केल्यानंतर गोळा असून, त्यामध्ये जवळपास पाच लिटर पाणी तयार झाले असल्याचे निदान झाले. तो गाेळा त्वरित काढला नसता तर कदाचित तो गोळा फुटण्याची भीती होती.

 

टॅग्स :doctorडॉक्टरchandrapur-acचंद्रपूर