शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चाचणी करणाऱ्यांमधून ९३ टक्के लोक निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देचाचण्यांना घाबरू नका, सोबत काळजीही घ्या : केवळ सात टक्केच लोकच निघाले पॉझिटिव्ह

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रशासनाने चाचण्यांचाही वेग वाढविला आहे. मात्र चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोरोना चाचणी केली तर पॉझिटिव्ह निघेल, या भीतीपोटी अनेकजण चाचणी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील चाचण्यांच्या व त्याच्या अहवालाच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर कोरोना चाचणी करणाऱ्यांपैकी तब्बल ९२.७७ नागरिक निगेटिव्ह निघाले आहेत. यावरून चाचणीबाबतची लोकांच्या मनातली भीती अनाठायी असल्याचे स्पष्ट होते.प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९५ हजार ८६३ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९४ हजार ३३८ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या एक हजार ५२५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ३१ हजार ४५५ चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर २९ हजार ९३८ चाचण्या अ‍ॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ५६ हजार ९५७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर तीन हजार ४४६ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. टक्केवारीचा हिशोब केला तर तब्बल ९२.७७ टक्के नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासोबतच चाचण्यांबाबतची भीती बाजुला सारून लोकांनी सौम्य लक्षणेही आढळल्यास मोकळे मनाने चाचणी करून घेणे गरजेचे आणि त्यांच्याच हिताचे आहे.चाचण्यांबाबतचा गैरसमज दूर करासमाजात कोरोना चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर तर ‘कोरोना कशामुळे होतो, तर तो चाचणी केल्याने होतो’ असा चुकीचा मॅसेज वायरल केला जात आहे. चाचणी केलेल्यांमधून ९२.७७ टक्के नागरिक निगेटिव्ह आले आहेत.आ. जोरगेवारांच्या प्रकृतीत सुधारणाचंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. यात ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून लोकमतला सांगितले. चार-पाच दिवसात कोरोनातून बरे होऊच चंद्रपूरला परत येईन, असेही ते म्हणाले. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.अ‍ॅन्टिजेनमुळे वाढल्या चाचण्यापूर्वी कोरोनाची चाचणी नागपूर येथील प्रयोगशाळेत केली जात होती. संशयित रुग्णाचा स्वॅब घेऊन तो नागपूरला पाठविला जात होता. दोन दिवसानंतर त्याचा अहवाल यायचा. त्यामुळे तेव्हा केवळ संशयिताचीच चाचणी केली जात होती. मात्र त्यानंतर चंद्रपुरातच युध्दपातळीवर कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅन्टिजेन चाचण्याही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे आता चाचण्यांचा वेग वाढला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या