शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

५५ हजार मजुरांचे ७.५० कोटी रूपये अडले

By admin | Updated: March 31, 2016 01:11 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम देण्याचा सरकारचा उद्देश असला तरी

तोंडावर आला ३१ मार्च : कंत्राटदारांचेही पाच कोटी अडलेचंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम देण्याचा सरकारचा उद्देश असला तरी काम होऊनही जिल्ह्यातील ५५ हजार मजुरांचे ७ कोटी ५ लाख रूपयांवर देणे अडले आहे. आर्थिक वर्षा संपायला अवघा एक दिवस उरला असतानाही मजुरांचा पैसा सरकारकडून न मिळाल्याने कंत्राटदार आणि मजूर हवालदिल झाले आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कुशल आणि अकुशल कामे करून त्या माध्यमातून ग्रामीणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या अंतर्गत ६० टक्के अकुलश कामे असून यात मातीकाम, नाला बांधकाम, शेततळे, बोड्या,रस्ते बांधकाम, नाला सरळीकरण, नाल्यांचे पनर्भरण, विहीरी बांधकाम, तलाव खोलीकरण आदी कामांचा अंतर्भाव होतो. तर ४० टक्के कुशल कामांचा समावेश असून यंत्रांच्या सहाय्याने करावयाची ही कामे असतात. मजूर आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून विकासकामे करून दुष्काळाच्या कामात अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यात ही योजना फलदायी ठरली आहे. मात्र हे आर्थिक वर्ष संपायला येवूनही ५५ हजार मजुरांचे ७ कोटी ५३ लाख रूपये अद्यापही मिळायचे आहग्ेत. या सोबतच कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या कामांचेही ५ कोटी रूपये अद्याप मिळायचे असल्याने कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांनी १० मार्चला एक पत्र काढून केंद्राकडून निधी उपलब्ध होईपर्यंत कुशल कामांच्या देयकांची प्रदाने बंद करून फक्त अकुलश कामांचीच देयके काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्राकडूनही निधी येण्याची शक्यता कमी असल्याने या अर्थिक वर्षात देयकांचा पैसा मिळण्याची शक्यता मावळल्यासारखी आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे ६० ला ४० हे प्रमाण अडचणीत येण्याची शक्यता कंत्राटदारांकडून वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)तर काँग्रेस करणार आंदोलनसरकारकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे मजूर आणि कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती केव्हा पालटणार याचाही अंदाज नाही. मात्र या प्रकारामुळे मजुरांचे हाल सुरू आहेत. सरकारने लवकर निधी दिला नाही तर काँग्रेसची मंडळी सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेतील गटनेते सतीश वारजुकर यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेतून दिला. वारजुकर म्हणाले, प्रशासनाला मनरेगाच्या आयुक्यांनी पाठविलेल्या पत्रातून निधी नसला तरी कामे सुरू ठेवा, एमआयएस करून ठेवा, निधी उपलब्ध होताच देयके प्रदान होतील असे म्हटले होते. त्यावर विश्वास ठेवून कंत्राटदार आणि मजुरांनी कामे केली. मात्र २९ मार्चपर्यंत अवस्था वाईट आहे. आता आर्थि वर्ष संपायला केवळ एक दिवस उरला असताना यात फारसा फरक पडेल, असे दिसत नाही. हे चित्र अत्यंत निराशाजनक असून राज्यात सर्व ठिकाणी हीच स्थित आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.